ई-सिगारेट विक्री बंदीच्या मागणीला वैद्यकीय तज्ज्ञांचा पाठिंबा

नवी मुंबई (प्रतिनिधी) : इतर सिगारेटला पर्याय व धुम्रपानाच्या सवयी सुटाव्यात यासाठी ई-सिगारेट बाजारात आल्या. पण या ई-सिगारेटमध्ये असलेले पदार्थ शरीराला घातक असतात. याची जाणीव केंद्र व राज्य सरकारला झाली. त्यामुळे शासनाने यावर बंदी आणली; परंतु आजही या सिगारेटची विक्री नवी मुंबईमधील काही भागांत सर्रास होऊ लागली आहे.


विशेष म्हणजे ई-सिगारेटचे व्यसन तरुण बांड, शाळकरी विद्यार्थ्यांना लागले आहे. यामुळे या तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. हे होऊ नये म्हणून ई-सिगारेट विरोधात नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी पुढाकार घेत ई-सिगारेट विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे. रवींद्र सावंत यांच्या मागणीला वैद्यकीय तज्ज्ञांनी देखील सहमती दाखवली आहे.


यामुळे भविष्यात गंभीर कर्करोगासारख्या आजारांचा सामना करावा लागत असून ई-सिगारेट घातक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


कर्करोगाचे कारण


सिगारेट म्हणजे कागदात गुंडाळलेली असते. त्यात तंबाखू, निकोटिन असते. जे मज्जासंस्थेवर कार्य करते. तसेच व्यासनास कारणीभूत ठरते. निकोटिन व्यतिरिक्त धुरामध्ये अनेक हानिकारक रसायने असतात. त्यामुळे अस्थमा, फुप्फुसाचे कर्करोग होत असतात, असे डॉ. हेमंत इंगोले यांनी सांगितले.


ई-सिगारेटमध्ये द्रव आणि एरोसोल पदार्थामध्ये निकोटिन, सोलव्हेट वाहक (पिजी आणि ग्लिसरॉल), तंबाखू-विशिष्ट नायट्रोसेमाईंस (टीएसएनए), अल्डीहाईड्स, धातू, अस्थिर सेंद्रिय संयुगे, फिनोलिक संयुगे, पोलिसायकलिक सुगंधी हायड्रॉ कार्बन, तंबाखू अल्कलॉईडस आणि औषधे असतात. - डॉ. सुशांत आंधळे, नवी मुंबई

Comments
Add Comment

Mulund Metro Slab: थेट रिक्षावर कोसळला मेट्रोचा स्लॅब; ३ ते ४ जण जखमी तर एकाच मृत्यू

मुलुंड: मुलूंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा अचानक स्लॅब कोसळ्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्लॅबखाली एका

मुंबई–नाशिक महामार्गावरील कोंडी लवकरच इतिहास जमा होणार? मार्च २०२६ पर्यंत .....

ठाणे : मुंबई–नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. माजिवडा ते वडपे या

रस्ते-मेट्रो-पाणी प्रकल्पांना गती देणार, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

१७०० कोटी प्रस्तावीत करण्याच्या पालकमंत्री शिंदे यांनी दिल्या सूचना पावसाळ्यापूर्वी ठाणे जिल्हा अलर्ट

10th-12 Board Exam 2026: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

ठाणे: आजपासून म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर २० फेब्रुवारी

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या