ई-सिगारेट विक्री बंदीच्या मागणीला वैद्यकीय तज्ज्ञांचा पाठिंबा

नवी मुंबई (प्रतिनिधी) : इतर सिगारेटला पर्याय व धुम्रपानाच्या सवयी सुटाव्यात यासाठी ई-सिगारेट बाजारात आल्या. पण या ई-सिगारेटमध्ये असलेले पदार्थ शरीराला घातक असतात. याची जाणीव केंद्र व राज्य सरकारला झाली. त्यामुळे शासनाने यावर बंदी आणली; परंतु आजही या सिगारेटची विक्री नवी मुंबईमधील काही भागांत सर्रास होऊ लागली आहे.


विशेष म्हणजे ई-सिगारेटचे व्यसन तरुण बांड, शाळकरी विद्यार्थ्यांना लागले आहे. यामुळे या तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. हे होऊ नये म्हणून ई-सिगारेट विरोधात नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी पुढाकार घेत ई-सिगारेट विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे. रवींद्र सावंत यांच्या मागणीला वैद्यकीय तज्ज्ञांनी देखील सहमती दाखवली आहे.


यामुळे भविष्यात गंभीर कर्करोगासारख्या आजारांचा सामना करावा लागत असून ई-सिगारेट घातक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


कर्करोगाचे कारण


सिगारेट म्हणजे कागदात गुंडाळलेली असते. त्यात तंबाखू, निकोटिन असते. जे मज्जासंस्थेवर कार्य करते. तसेच व्यासनास कारणीभूत ठरते. निकोटिन व्यतिरिक्त धुरामध्ये अनेक हानिकारक रसायने असतात. त्यामुळे अस्थमा, फुप्फुसाचे कर्करोग होत असतात, असे डॉ. हेमंत इंगोले यांनी सांगितले.


ई-सिगारेटमध्ये द्रव आणि एरोसोल पदार्थामध्ये निकोटिन, सोलव्हेट वाहक (पिजी आणि ग्लिसरॉल), तंबाखू-विशिष्ट नायट्रोसेमाईंस (टीएसएनए), अल्डीहाईड्स, धातू, अस्थिर सेंद्रिय संयुगे, फिनोलिक संयुगे, पोलिसायकलिक सुगंधी हायड्रॉ कार्बन, तंबाखू अल्कलॉईडस आणि औषधे असतात. - डॉ. सुशांत आंधळे, नवी मुंबई

Comments
Add Comment

Thane News : ठाणे हादरलं! 'जीवंत सोडणार नाही' धमकी दिली अन् १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीला... बंद घरात नेमकं काय घडलं?

ठाणे : प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाने आपल्या १७ वर्षीय मैत्रिणीला पेटवून दिल्याचा अत्यंत

आपला दवाखान्यातील डॉक्टर आणि कर्मचारी यांचा पगार ठाणे महापालिका बॅंक गॅरंटीतून देणार

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आरोग्य विभागाला निर्देश ठाणे : आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड

ठाण्यात वाघीण मैदानात! चित्रा वाघ ॲक्शन मोडवर; वाघ यांच्या एन्ट्रीने अनेकांची धाकधूक वाढली!

कळवा: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज

नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त ठाणे  : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा

सुजाता मडके या शहापूरच्या कन्येची ‘इस्रो’मध्ये थरारक झेप

ठाणे : ‘यशाला शॉर्टकट नसतो, पण जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल तर अवकाशातही भरारी घेता येते,’ या शब्दात

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह