द्रौपदी मुर्मू देशाच्या १५व्या राष्ट्रपती

नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या देशाच्या १५व्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. त्या देशाच्या पहिल्या आदिवासी व दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू या प्रचंड मतांनी विजयी झाल्या. पहिल्याच फेरीत त्यांना ५४० मतं मिळाली. पहिली फेरी पूर्ण होताच देशभरात आनंदोत्सवाला सुरुवात झाली. देशातील पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती पदावर निवडून आल्याने सर्वंच ठिकाणाहून आनंदाचा वर्षाव होत आहे. आदीवासी पाड्यांवर देखील मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव करण्यात आला.


राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलै रोजी मतदान झाल्यानंतर आज गुरुवारी (ता. २१) जुलै रोजी सकाळी ११ वाजता संसद भवनात मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षातर्फे यशवंत सिन्हा हे दोन उमेदवार रिंगणात होते. विशेष म्हणजे १५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी प्रतिभाताई पाटील यांच्या रूपाने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. यंदाच्या निवडणूकीतही महिला उमेदवार असल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पहिल्याच फेरीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना ५४० मतं मिळाली. तर विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना अवघी २०८ मतं मिळाली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत १५ खासदारांची मतं अमान्य ठरली.


दरम्यान, मुर्मू यांच्या विजयानंतर पोस्टरमध्ये द्रौपदी मुर्मूंसोबत इतर कोणत्याही नेत्याचा फोटो लावू नये, अशा सक्त सूचना पक्ष कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीपासून पक्षाने २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे.

Comments
Add Comment

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'

स्मशानभूमीत जळत्या चितेशेजारी मुलांचा अभ्यास

अनोख्या शाळेची देशभरात चर्चा बिहार : सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की वर्ग येतात, कॅन्टीन असतं, मुलांना खेळायला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून भाजप, आरएसएसचे कौतुक!

जुना फोटो शेअर करत म्हणाले, ‘हीच संघटनेची शक्ती…’ नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार

देशात मल्टी-डोअर न्यायालये असावीत, विवादांची सुनावणी नको, ते सोडवावेत

गोव्यात 'मध्यस्थी' विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न पणजी : मध्यस्थता कायद्याच्या दुर्बळतेचे लक्षण नाही, तर तो

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू