मुंबई : महाआघाडी सरकारमधले अनेक मंत्री, शिवसेना नेते भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर होते. अनिल परब, प्रताप सरनाईक, भावना गवळी, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊतांवरही कारवाई करण्याची मागणी ते करत होते. काल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर सोमय्यांनी आता संजय राऊतांची पाळी, असे ट्वीट केले आहे.
सोमय्या यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि आरोपांमुळे अनेक शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांना चौकशीला सामोरे जावे लागले आहे. आता संजय राऊतांची पाळी आहे, असे सूचक ट्वीट किरीट सोमय्या यांनी केले आहे. त्यामुळे आता संजय राऊतांच्या ईडी चौकशीकडे लक्ष लागले आहे.
आज मुंबई ईडी कार्यालयात संजय राऊत यांना हजर राहण्याचे समन्स आले आहे. गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्यासंदर्भात चौकशीसाठी त्यांना हे समन्स आहे. मात्र पावसाळी अधिवेशन दिल्लीत सुरू आहे. त्यामुळे राऊत यांचे वकील वेळ मागून घेणार असल्याची माहिती आहे.
गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्याविषयी किरीट सोमय्या यांनी पाठपुरावा केला होता. काल याआधी ही सोमय्या यांनी अनिल देशमुख, नवाब मलिक तसेच अनिल परब यांना चौकशीला सामोरे जावे लागले आहे आणि आता संजय राऊत यांना देखील चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…