आता संजय राऊतांची पाळी!

  78



मुंबई : महाआघाडी सरकारमधले अनेक मंत्री, शिवसेना नेते भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर होते. अनिल परब, प्रताप सरनाईक, भावना गवळी, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊतांवरही कारवाई करण्याची मागणी ते करत होते. काल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर सोमय्यांनी आता संजय राऊतांची पाळी, असे ट्वीट केले आहे.


https://twitter.com/KiritSomaiya/status/1549560858199527424

सोमय्या यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि आरोपांमुळे अनेक शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांना चौकशीला सामोरे जावे लागले आहे. आता संजय राऊतांची पाळी आहे, असे सूचक ट्वीट किरीट सोमय्या यांनी केले आहे. त्यामुळे आता संजय राऊतांच्या ईडी चौकशीकडे लक्ष लागले आहे.


आज मुंबई ईडी कार्यालयात संजय राऊत यांना हजर राहण्याचे समन्स आले आहे. गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्यासंदर्भात चौकशीसाठी त्यांना हे समन्स आहे. मात्र पावसाळी अधिवेशन दिल्लीत सुरू आहे. त्यामुळे राऊत यांचे वकील वेळ मागून घेणार असल्याची माहिती आहे.


गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्याविषयी किरीट सोमय्या यांनी पाठपुरावा केला होता. काल याआधी ही सोमय्या यांनी अनिल देशमुख, नवाब मलिक तसेच अनिल परब यांना चौकशीला सामोरे जावे लागले आहे आणि आता संजय राऊत यांना देखील चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

Comments
Add Comment

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

माजी मंत्री थोरात हे समाजकारणातील हिरो : सयाजी शिंदे

संगमनेर : चिंचोली गुरव येथे झालेल्या पाणी परिषदेमुळे निळवंडे येथे धरणाची जागा निश्चित झाली. धरण व कालव्यासाठी