मुंबईत मुली बेपत्ता होण्यावर राज ठाकरेंचा सवाल; मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

मुंबई : राज्यात विशेषतः मुंबईत मुली आणि लहान मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. गेल्या दहा महिन्यांत राज्यात मुलींच्या अपहरणाचे तब्बल १,१८७ गुन्हे दाखल झाले असून दररोज सरासरी चार ते पाच मुली बेपत्ता होत असल्याची गंभीर बाब त्यांनी अधोरेखित केली आहे.


राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे की, एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०२१ ते २०२४ या कालावधीत लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये जवळपास ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. लहान मुलांना पळवून त्यांना कामाला जुंपणे, भीक मागायला लावणे यासाठी आंतरराज्य टोळ्या कार्यरत असल्याचा आरोप करत, या टोळ्या इतक्या बिनधास्तपणे कशा काम करतात, असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.






 

फक्त किती गुन्हे दाखल झाले आणि किती मुलं सापडली, एवढी आकडेवारी देऊन सरकारने जबाबदारी झटकू नये, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. अनेक पालक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायलाच पोहोचत नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुलांची सुटका झाली तरी त्या काळात त्यांच्या मनावर होणाऱ्या मानसिक आघाताचं काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.


रस्त्यावर, स्टेशनवर आणि बसस्थानकांवर भीक मागणारी लहान मुलं नेमकी कोणाची आहेत, त्यांच्यासोबत असलेली व्यक्ती खरंच पालक आहे का, याची चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. गरज भासल्यास डीएनए चाचणीचे आदेश देण्याची तयारी सरकारने दाखवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.राज्यात लहान मुलं, तरुण मुली आणि जमिनी पळवल्या जात असताना या गंभीर विषयांवर विधिमंडळात चर्चा का होत नाही? असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांनाही लक्ष्य केले आहे. हिवाळी अधिवेशन केवळ पुरवणी मागण्या मंजूर करण्यापुरतेच मर्यादित राहते का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.


अधिवेशनात अनेकदा मंत्री उपस्थित नसतात, त्यामुळे अशा गंभीर विषयांवर चर्चा होईल अशी अपेक्षा करणंही अवघड झाल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारनेही सर्व राज्यांशी चर्चा करून या विषयावर कृतिगट तयार करायला हवा, मात्र मातांच्या वेदना ऐकण्याऐवजी इतर मुद्द्यांवरच चर्चा होत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात वैयक्तिक लक्ष घालून केवळ चर्चा न करता ठोस कृती करावी, हीच महाराष्ट्राची अपेक्षा असल्याचे राज ठाकरे यांनी पत्राच्या शेवटी नमूद केले आहे.

Comments
Add Comment

Diksha Karkar : व्यवसायधारकांकडून नोंदणी शुल्क आणि कचरा निर्मुलन आकार पुन्हा वसूल करा

विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर यांची आयुक्तांकडे मागणी मुंबई : केंद्र शासनाच्या एक देश एक कर प्रणाली या

BMC : प्रत्येक सोसायट्यांच्या आवारात एक झाड लावा

महापालिका सभागृहनेते गणेश खणकर यांनी केले आवाहन मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पांमध्ये सुमारे १२०० झाडे

Sanjay Ghadi Deputy Mayor BMC : नाल्यात कचरा टाकणे टाळा, उपमहापौरांचे नागरिकांना आवाहन

मुंबई : पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नालेसफाईची सुमारे ८० टक्के कामे पूर्णत्वाकडे आली असली तरी नाल्यांमध्ये

Mantri Nitesh Rane : वर्सोवा ते मांडवा जलवाहतूक सुरू करणार

मंत्री नितेश राणे यांची घोषणा; मच्छिमार संस्थांना शासन सहकार्यातून इलेक्ट्रिक बोटी उपलब्ध करून देणार मुंबई :

Chief Minister Devendra Fadnavis : ॲग्रीगेटर सहकारी टॅक्सी सेवांसाठी नियमावली तयार करावी

टॅक्सी चालकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार मुंबई,  महाराष्ट्रात ऑनलाइन ॲप आधारित ॲग्रीगेटर सहकारी

मंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून वर्सोव्यात 'नरिमन पॉईंट'सारख्या सुविधा उपलब्ध करून देऊ!

खासदार नारायण राणे यांचा विश्वास; वर्सोवा प्रवासी जेट्टी आणि ऑनलाइन तिकीट प्रणालीचा शुभारंभ मुंबई : "मुंबईसह