मुंबईत मुली बेपत्ता होण्यावर राज ठाकरेंचा सवाल; मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

मुंबई : राज्यात विशेषतः मुंबईत मुली आणि लहान मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. गेल्या दहा महिन्यांत राज्यात मुलींच्या अपहरणाचे तब्बल १,१८७ गुन्हे दाखल झाले असून दररोज सरासरी चार ते पाच मुली बेपत्ता होत असल्याची गंभीर बाब त्यांनी अधोरेखित केली आहे.


राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे की, एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०२१ ते २०२४ या कालावधीत लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये जवळपास ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. लहान मुलांना पळवून त्यांना कामाला जुंपणे, भीक मागायला लावणे यासाठी आंतरराज्य टोळ्या कार्यरत असल्याचा आरोप करत, या टोळ्या इतक्या बिनधास्तपणे कशा काम करतात, असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.






 

फक्त किती गुन्हे दाखल झाले आणि किती मुलं सापडली, एवढी आकडेवारी देऊन सरकारने जबाबदारी झटकू नये, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. अनेक पालक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायलाच पोहोचत नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुलांची सुटका झाली तरी त्या काळात त्यांच्या मनावर होणाऱ्या मानसिक आघाताचं काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.


रस्त्यावर, स्टेशनवर आणि बसस्थानकांवर भीक मागणारी लहान मुलं नेमकी कोणाची आहेत, त्यांच्यासोबत असलेली व्यक्ती खरंच पालक आहे का, याची चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. गरज भासल्यास डीएनए चाचणीचे आदेश देण्याची तयारी सरकारने दाखवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.राज्यात लहान मुलं, तरुण मुली आणि जमिनी पळवल्या जात असताना या गंभीर विषयांवर विधिमंडळात चर्चा का होत नाही? असा सवाल उपस्थित करत राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांनाही लक्ष्य केले आहे. हिवाळी अधिवेशन केवळ पुरवणी मागण्या मंजूर करण्यापुरतेच मर्यादित राहते का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.


अधिवेशनात अनेकदा मंत्री उपस्थित नसतात, त्यामुळे अशा गंभीर विषयांवर चर्चा होईल अशी अपेक्षा करणंही अवघड झाल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारनेही सर्व राज्यांशी चर्चा करून या विषयावर कृतिगट तयार करायला हवा, मात्र मातांच्या वेदना ऐकण्याऐवजी इतर मुद्द्यांवरच चर्चा होत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात वैयक्तिक लक्ष घालून केवळ चर्चा न करता ठोस कृती करावी, हीच महाराष्ट्राची अपेक्षा असल्याचे राज ठाकरे यांनी पत्राच्या शेवटी नमूद केले आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : परदेश दौरे रद्द करा, मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्याही कमी करा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश; सामान्य प्रशासन विभागाकडून मंत्र्यांच्या लवाजम्याचा आढावा घेण्यास

Reserve Bank of India (RBI) : रिझर्व्ह बँकेकडून सर्वोदय सहकारी बँकेचा परवाना रद्द

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) (RBI) मुंबईतील 'सर्वोदय सहकारी बँके'चा परवाना अखेर रद्द केला आहे. बँकेकडे

Amol Mitkari : १४ मेपासून नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात!

अमोल मिटकरींनी आमदारकीच्या शेवटच्या दिवशी सुनेत्रा पवारांची घेतली भेट मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे

BMC News : माहुलमधील प्रकल्पबाधितांच्या वसाहतीमध्ये पायाभूत सुविधा तातडीने पुरवा ; स्थायी समिती अध्यक्षांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई: मुंबईतील विविध प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या कुटुंबांचे माहुल येथील एसआरए प्रकल्पांतर्गत बांधण्यात

BMC : पहाटेच पोहोचल्या महापालिका आयुक्त सफाई कामगारांच्या भेटीला...

मुंबई :  असे म्हटले जाते की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नांदते आणि जिथे स्वच्छता असते तिथे आरोग्य निरोगी

BMC News : महापालिका आयुक्त जेव्हा पहाटेच कांजूर मार्ग डम्पिंग ग्राउंडवर पोहोचतात, तेव्हा...

मुंबई: मुंबईकर जेव्हा गाढ झोपेत किंवा कुणी लवकर उठून मॉर्निंग वॉकला फिरत असतात,त्यावेळेस मुंबई महापालिकेच्या