रडार स्थलांतराला केंद्राची संमती; दहिसर-जुहू परिसरातील पुनर्विकासाला मिळणार गती

मुंबई : दहिसर आणि जुहू (डी.एन.नगर) येथील उच्च वारंवारता रडार केंद्रांमुळे रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी तसेच ‘Housing for All’ या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे महत्त्वाचे निवेदन सादर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या या निवेदनात रडार स्थलांतर आणि नव्या गृहनिर्माण धोरणाची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे.


दहिसर आणि जुहू परिसरात असलेल्या उच्च वारंवारता रडार केंद्रांच्या आजूबाजूला इमारतींच्या उंचीवर मर्यादा येत असल्याने या भागांचा पुनर्विकास अडचणीत आला आहे. त्यामुळे ही रडार केंद्रे तांत्रिकदृष्ट्या योग्य असलेल्या इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारत सरकारआणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी दहिसर येथील रडार गोरेगाव येथे स्थलांतरित करण्यास संमती दर्शवली आहे.


या प्रक्रियेसाठी महाराष्ट्र सरकारने स्थलांतराचा खर्च उचलण्याची तसेच पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. गोरेगाव येथील जमीन भारत सरकारकडे विनामूल्य हस्तांतरित केली जाणार असून, एएआय दहिसर येथील ५० टक्के जमीन सार्वजनिक बागेसाठी वापरणार आहे. एएआयच्या तांत्रिक पथकाला जुहू येथील रडारसाठीही पर्यायी जागेची पाहणी करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तांत्रिक अभ्यास पूर्ण झाल्यानंतर जुहू रडार स्थलांतराच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता