'एनआयए'चा बिहारच्या मदरशावर छापा, एकाला अटक

मोतिहारी (हिं.स.) : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बिहारच्या पूर्वी चंपारण जिल्ह्यातील जामिया मारिया निस्वा मदरशावर छापा टाकला आणि एका शिक्षकाला अटक केली. असगर अली असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला पाटणा येथे नेण्यात आले आहे. यासोबतच एनआयएने आणखी दोघांना ताब्यात घेतले होते. परंतु, चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले.


पटना येथील फुलवारी शरीफ परिसरातून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) अतहर परवेझ आणि मोहम्मद जल्लाउद्दीन यांना अटक केल्यानंतर तपास पूर्व चंपारण जिल्ह्यातही पोहोचला आहे. या प्रकरणाच्या तपासात चकिया येथील रियाजचे नाव समोर आल्यानंतर जिल्ह्यातील अनेक भाग सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आले. एनआयएचे दोन पथक मोतिहारी येथे पोहोचले. एनआयएच्या पहिल्या पथकाने मदरशातील शिक्षकाची चौकशी करून त्याला अटक केली, तर इतर दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. लॅपटॉपचीही तपासणी करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या दोघांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले.


एनआयएची दुसरी टीम पलानवा पोलीस स्टेशन हद्दीतील गड सिसवानिया गावात असगर अलीच्या घरी पोहोचली. यावेळी रक्सौलचे डीएसपी आणि इतर पोलिस अधिकारी देखील एनआयएच्या पथकासोबत होते. यावेळी पुस्तकांनी भरलेल्या पाच बॅगा एनआयएने जप्त केल्या. बिहार पोलिसांनी अलीकडेच अतिरेकी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (पीएफआय) काही दुवे असलेल्या संभाव्य दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड केला होता. तसेच भारतविरोधी कारवायांमधील सहभागाबद्दल पटनाच्या फुलवारी शरीफ परिसरातून दोन आरोपींना अटक केली. त्यानंतर आणखी तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांची संख्या पाच झाली आहे. यातील एका आरोपीला उत्तर प्रदेश पोलिसांनी लखनऊ येथून अटक केली आहे.


अटक केलेल्यांमध्ये झारखंडचे निवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद जल्लाउद्दीन आणि स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाचे (सीमी) आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे (एसडीपीआय) सदस्य देखील आहेत. फुलवारीशरीफचे एसएसपी मनीष कुमार यांनी सांगितले की, एकूण २६ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यापैकी ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Shashi Tharoor : 'आमच्यात सर्वकाही अलबेल',राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना भेटल्यानंतर शशी थरूर यांचं विधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आज, गुरुवारी (२९ जानेवारी) पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी

Supreme Court On UGC: सर्वोच्च न्यायालयाकडून यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रीय विद्यापीठ आयोगाच्या  म्हणजेच यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती देण्यात आली

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत 'महाराष्ट्र पॅटर्न'चे सर्वोच्च न्यायालयाने केले कौतुक

अन्य राज्यांच्या उपाययोजनांवर ओढले ताशेरे नवी दिल्ली :देशातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि नागरिकांना

भारतीय उद्योगांसाठी युरोपीयन बाजारपेठ

९० टक्के वस्तूंवर शुल्क माफ करारामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना बळ नवी दिल्ली : भारत आणि युरोपीयन

भारताला नुकसान पोहोचवणे, हाच पाकिस्तानचा अजेंडा

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘पाकिस्तानने नेहमीच विनाकारण

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

१ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर