'एनआयए'चा बिहारच्या मदरशावर छापा, एकाला अटक

मोतिहारी (हिं.स.) : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बिहारच्या पूर्वी चंपारण जिल्ह्यातील जामिया मारिया निस्वा मदरशावर छापा टाकला आणि एका शिक्षकाला अटक केली. असगर अली असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला पाटणा येथे नेण्यात आले आहे. यासोबतच एनआयएने आणखी दोघांना ताब्यात घेतले होते. परंतु, चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले.


पटना येथील फुलवारी शरीफ परिसरातून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) अतहर परवेझ आणि मोहम्मद जल्लाउद्दीन यांना अटक केल्यानंतर तपास पूर्व चंपारण जिल्ह्यातही पोहोचला आहे. या प्रकरणाच्या तपासात चकिया येथील रियाजचे नाव समोर आल्यानंतर जिल्ह्यातील अनेक भाग सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आले. एनआयएचे दोन पथक मोतिहारी येथे पोहोचले. एनआयएच्या पहिल्या पथकाने मदरशातील शिक्षकाची चौकशी करून त्याला अटक केली, तर इतर दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. लॅपटॉपचीही तपासणी करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या दोघांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले.


एनआयएची दुसरी टीम पलानवा पोलीस स्टेशन हद्दीतील गड सिसवानिया गावात असगर अलीच्या घरी पोहोचली. यावेळी रक्सौलचे डीएसपी आणि इतर पोलिस अधिकारी देखील एनआयएच्या पथकासोबत होते. यावेळी पुस्तकांनी भरलेल्या पाच बॅगा एनआयएने जप्त केल्या. बिहार पोलिसांनी अलीकडेच अतिरेकी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (पीएफआय) काही दुवे असलेल्या संभाव्य दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड केला होता. तसेच भारतविरोधी कारवायांमधील सहभागाबद्दल पटनाच्या फुलवारी शरीफ परिसरातून दोन आरोपींना अटक केली. त्यानंतर आणखी तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांची संख्या पाच झाली आहे. यातील एका आरोपीला उत्तर प्रदेश पोलिसांनी लखनऊ येथून अटक केली आहे.


अटक केलेल्यांमध्ये झारखंडचे निवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद जल्लाउद्दीन आणि स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाचे (सीमी) आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे (एसडीपीआय) सदस्य देखील आहेत. फुलवारीशरीफचे एसएसपी मनीष कुमार यांनी सांगितले की, एकूण २६ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यापैकी ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या