'एनआयए'चा बिहारच्या मदरशावर छापा, एकाला अटक

मोतिहारी (हिं.स.) : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बिहारच्या पूर्वी चंपारण जिल्ह्यातील जामिया मारिया निस्वा मदरशावर छापा टाकला आणि एका शिक्षकाला अटक केली. असगर अली असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला पाटणा येथे नेण्यात आले आहे. यासोबतच एनआयएने आणखी दोघांना ताब्यात घेतले होते. परंतु, चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले.


पटना येथील फुलवारी शरीफ परिसरातून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) अतहर परवेझ आणि मोहम्मद जल्लाउद्दीन यांना अटक केल्यानंतर तपास पूर्व चंपारण जिल्ह्यातही पोहोचला आहे. या प्रकरणाच्या तपासात चकिया येथील रियाजचे नाव समोर आल्यानंतर जिल्ह्यातील अनेक भाग सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आले. एनआयएचे दोन पथक मोतिहारी येथे पोहोचले. एनआयएच्या पहिल्या पथकाने मदरशातील शिक्षकाची चौकशी करून त्याला अटक केली, तर इतर दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. लॅपटॉपचीही तपासणी करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या दोघांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले.


एनआयएची दुसरी टीम पलानवा पोलीस स्टेशन हद्दीतील गड सिसवानिया गावात असगर अलीच्या घरी पोहोचली. यावेळी रक्सौलचे डीएसपी आणि इतर पोलिस अधिकारी देखील एनआयएच्या पथकासोबत होते. यावेळी पुस्तकांनी भरलेल्या पाच बॅगा एनआयएने जप्त केल्या. बिहार पोलिसांनी अलीकडेच अतिरेकी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (पीएफआय) काही दुवे असलेल्या संभाव्य दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड केला होता. तसेच भारतविरोधी कारवायांमधील सहभागाबद्दल पटनाच्या फुलवारी शरीफ परिसरातून दोन आरोपींना अटक केली. त्यानंतर आणखी तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांची संख्या पाच झाली आहे. यातील एका आरोपीला उत्तर प्रदेश पोलिसांनी लखनऊ येथून अटक केली आहे.


अटक केलेल्यांमध्ये झारखंडचे निवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद जल्लाउद्दीन आणि स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाचे (सीमी) आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे (एसडीपीआय) सदस्य देखील आहेत. फुलवारीशरीफचे एसएसपी मनीष कुमार यांनी सांगितले की, एकूण २६ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यापैकी ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी