चंद्रपूर (हिं.स.) : काही अपवाद वगळता जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली असली असली तरी अद्यापही धोका कायमच आहे. परिणामी पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील काही रस्ते बंद आहेत, तर काही भागातून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले जात आहे.
पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चारवट, हडस्ती येथील ईरई नदीचे पुलावर जवळपास ७ फूट पुराचे पाणी असल्याने दोन्ही गावांचा मार्ग बंद आहे. दरम्यान बामणी येथील वर्धा नदी पुलावर पुराचे पाणी वाढल्याने बल्लारपूर- राजूरा- हैदराबाद मार्ग बंद झाला आहे.
दहेली येथे वर्धा नदीचे पाणी वाढल्याने येथील २० कुटुंबातील सदस्यांना शाळेत रात्री ठेवण्यात आले. चारवट येथील १८ कुटुंबातील सदस्यांना नवीन चारवट येथे स्थलांतरित करण्यात आले. हडस्ती, चारवट, जुनी चारवट येथे सभोवताल सोमवारी रात्रीपासून पुराचे पाणी असल्याने संपर्क तुटला आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…