अरे बाप रे... रायगड जिल्ह्यातील १३३ धोकादायक पूल कधीही कोसळण्याची शक्यता

  157

अलिबाग (वार्ताहर): सावित्री पुलानंतर जिल्ह्यातील अन्यत्र असलेल्या जुन्या पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अनेक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीटदेखील करण्यात आले आहेत. मात्र रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असलेले रायगड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे १३३ पूल धोकादायक असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यापैकी कोणता पूल कधी पडेल याची शाश्वती उरलेली नाही. या सर्व पुलांच्या दुरुस्तीसाठी ९८ कोटी ५० लाख रुपयांचा प्रस्ताव सरकारकडे रायगड जिल्हा परिषदेकडून पाठविलेला असला, तरी अद्याप सरकारकडून या पुलांच्या दुरुस्तीसाठी निधीच न मिळाल्याने पुलांची कामे मार्गी लागू शकलेली नाहीत.


दरवर्षी रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडतो. त्यामुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली जाऊन पुलांचे बांधकाम जीर्ण झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील १३३ पूल असून, हे सर्वच्या सर्व पूल धोकादायक असल्याचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आ. बारदेस्कर यांनी सांगितले.


अलिबाग तालुक्यात दहा पूल धोकादायक असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी दहा कोटींचा निधी अपेक्षित आहे. मुरुड तालुक्यात ४० पूल धोकादायक असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी सात कोटींचा निधी अपेक्षित आहे. रोहा तालुक्यात सात पूल धोकादायक असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी सात कोटींची निधी अपेक्षित आहे. पेण तालुक्यात एकुण नऊ पूल धोकादायक असून, या पुलांच्या दुरुस्तीसाठी नऊ कोटी अपेक्षित आहे. सुधागड तालुक्यात एकुण आठ पूल धोकादायक असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी आठ कोटींचा निधी अपेक्षित आहे.


कर्जत तालुक्यात सहा पूल धोकादायक असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी आठ कोटींचा निधी अपेक्षित आहे. खालापूर तालुक्य़ात तीन पूल धोकादायक असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी चार कोटींचा निधी अपेक्षित आहे. पनवेल तालुक्यात १७ धोकादायक पूल असून, या पुलांच्या दुरुस्तीसाठी नऊ कोटींचा निधी अपेक्षित आहे. उरण तालुक्यात चार धोकादायक पूल असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी चार कोटींचा निधी अपेक्षित आहे.


महाड तालुक्यात एकूण आठ पूल धोकादायक असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी सात कोटींचा निधी अपेक्षित आहे. पोलादपूर तालुक्यात सात पूल धोकादायक असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी सात कोटी ५० लाखांचा निधी अपेक्षित आहे. माणगाव तालुक्यात एक पूल असून, त्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटींचा निधी अपेक्षित आहे.


म्हसळा तालुक्यात सहा धोकादायक पूल असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी आठ कोटींचा निधी अपेक्षित आहे.


श्रीवर्धन तालुक्यात एकुण सात धोकादायक पूल असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी आठ कोटींचा निधी अपेक्षित आहे. तळा तालुक्यात एकही पूल धोकादायक नसल्याचे सांगण्यात आले.

Comments
Add Comment

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

Maharashtra Monsoon Session 2025: इंद्रायणी पुलाचा मुद्दा विधानसभेत, पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल झाली चर्चा

मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारी ३० जूनपासून सुरू झाले असून, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा

म्हाडा छत्रपती संभाजीनगर, नाशिक मंडळातर्फे १४१८ निवासी सदनिका व भूखंडांसाठी सोडत

सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसह अर्ज भरणा प्रक्रिया सुरू मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक