पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे पर्यटनबंदीचे आदेश कागदावरच!

Share

विरार (प्रतिनिधी) : वसई तालुक्यातील धोकादायक पर्यटनस्थळांवर होणारे अपघात आणि मृत्यूंचे प्रमाण अधिक असून याठिकाणी पर्यटनासाठी येण्यास पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश काढले आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचे हे आदेश कागदावरच राहिले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वसईतील धोकादायक पर्यटनस्थळांवर विकेण्डला पर्यटक मोठ्या संख्येने येतात. पर्यटनबंदी असतानादेखील पर्यटक जीव धोक्यात घालून पर्यटनस्थळांवर येत असल्याने धोका वाढला आहे. पोलीस आणि वन विभागाने लागू केलेल्या या पर्यटनबंदीतही पर्यटकांनी फुललेल्या मळ्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे संतापजनक चित्र दिसून येत आहे.

वसई तालुक्यात तुंगारेश्वर व चिंचोटी या तुंगारेश्वर अभयारण्यातील धबधब्यांवर दरवर्षी मुंबई, ठाणे, पालघर, वसईतून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. दरवर्षी वरील दोन्ही धबधब्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांच्या मृत्यूच्या घटना घडलेल्या आहेत. कोरोना काळात वरील दोन्ही धबधब्यांवर सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घालण्यात आली होती. मात्र तरीही पर्यटक बंदी झुगारून देऊन पर्यटक सदर ठिकाणी यायचे. तेव्हाही पोलीस आणि वन विभागाच्या दुर्लक्षामुळे पर्यटकांचा बळी गेला होता.

आता पावसाळ्यात पुन्हा जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसाळ यांनी पर्यटनबंदीचे आदेश काढले आहेत. मात्र सदरचे आदेश झुगारून देत पर्यटक धोकादायक धबधब्यांवर येतच आहेत. वन विभागाचे कर्मचारी व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पर्यटकांची सुरक्षा पुन्हा एकदा रामभरोसे उरली आहे. पोलीस व वन विभागाचे कर्मचारी धोकादायक पर्यटनस्थळांवर बंदोबस्त ठेवत नसल्याने विकेण्डला या धोकादायक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्यामुले एखादी दुर्घटना घडल्यानंतरच या वन आणि पोलीस प्रशासनाला जाग येईल का? असा सवाल सुज्ञ नागरिकांनी केला आहे.

Recent Posts

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यात सुरक्षा यंत्रणांची चूक; सर्वपक्षीय बैठकीत केंद्राची कबुली

नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने…

1 minute ago

RCB vs RR, IPL 2025: आरसीबीचे राजस्थानला २०६ धावांचे आव्हान

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…

50 minutes ago

Simla Agreement: भारताने सिंधू नदीचे पाणी थांबवले तर पाकिस्तानकडून शिमला करार स्थगित करण्याची दर्पोक्ती! काय आहे हा शिमला करार?

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…

59 minutes ago

महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल

१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…

1 hour ago

प्रभासच्या नायिकेवर पाकिस्तानी सैन्याशी संबंध असल्याचा आरोप, पोस्ट शेअर करत म्हणाली- माझा कोणताही संबंध नाही

पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…

2 hours ago

Maharashtra Weather : सूर्य आग ओकणार! ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…

2 hours ago