पंढरपूर : पंढरपूरमध्ये जेवणातून वारकऱ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारी जेवणामध्ये बासुंदी, पत्ता कोबी, बेसन आणि चपातीचा आस्वाद घेतल्यानंतर संध्याकाळी वारकऱ्यांना उलटी, पोटदुखी, जुलाब असा त्रास होऊ लागला. त्यामुळे जवळपास ३० ते ३२ जणांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. यामधील १० ते १५ जणांना रात्री अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी अरविंद गिराम यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील श्री विठ्ठल आश्रम ६५ एकर जवळील मठामध्ये दुपारी जेवण झाल्यावर अचानक वारकऱ्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना ताबोडतोब उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. जेवणात बासुंदी, पत्ताकोबी, बेसन, खाल्ल्याचे रूग्णांकडून सांगण्यात आले. रुग्णांमध्ये बालकांसह ३० ते ३५ वयोगटातील वारकऱ्यांचा समावेश आहे.
विषबाधा झालेले सर्वजण श्री विठ्ठल आश्रम येथे संप्रदायक शिक्षण घेत आहेत. हे सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यातील रहिवासी आहेत. यामध्ये प्रदीप विठ्ठल शिरोळे, सुदर्शन सगळे, ओंकार निर्मले, प्रणव शिंदे, पवन सुलतानी, दर्शन जाधव, गोरख जयभद्र, विनायक नाडे, वैभव कुंभार, आदिनाथ मालकर, केशव पवार, अभिजीत शिंदे, लक्ष्मण फुके, ऋषिकेश कोल्हे, नितीन गव्हाड, ऋषिकेश तांबे, अर्जुन पवार, गणेश राहणे, प्रताप गीते, ऋषिकेश चव्हाण, अभिषेक मोरे, करण परदेशी, स्वागत गाजरे, हरिशचंद्र लोखंडे, अतुल सुरवसे, वैभव शेटे, माऊली गवाड यांचा समावश आहे.
दरम्यान, हे सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यातील असून पळसगाव, निमगाव, हळेगाव, वैजापूर, तळोशी, ढाणगाव दौंड, परभणी, कोल्हापूर , शेळवे पंढरपूर, पाटणे, जालना, सिंदखेड, सावरखेड, नाशिक, ढवळगाव, कोपरगाव, जालना, पैठण, दौंड या ठिकाणचे मूळ रहिवासी आहेत.
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…