तिस्ता सेटलवाड, अहमद पटेलांनी रचला होता मोदींना अडकवण्याचा कट

अहमदाबाद : सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्यासह इतरांनी गुजरात दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अडकवण्याचा कट रचला होता, अशी माहिती विशेष तपास पथकाने सेशन्स कोर्टाला सांगितले. मोदींचे गुजरातमधील सरकार काहीही करुन पाडायचे, यासाठी हे कारस्थान रचल्याचेही एसआयटीने म्हटले आहे.


एसआयटीने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले यावेळी त्यांनी आरोपींच्या जामिनाला विरोध केला. जामिनाला विरोध करताना एसआयटी अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितले की, गुजरातची प्रतिमा खराब करण्यासाठी कट रचला गेला होता. यासाठी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचा सहभाग होता. ते तेव्हा राज्यसभा खासदार आणि काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार होते.


एसआयटीच्या चौकशी समितीने दावा केला आहे की, गुजरातमधील निवडून आलेले सरकार पाडणे हे सेटलवाड यांचे राजकीय ध्येय होते. विरोधी पक्षाकडून त्यांना यासाठी अवैध मार्गाने ३० लाख रुपये मिळाले होते. विरोधी पक्षाकडून सेटलवाड यांना गुजरातमधील विविध अधिकारी आणि निरपराध लोकांना विविध प्रकरणांमध्ये अडकवणे आणि त्यांच्यावर खटले चालवण्याचे त्या काम करत होत्या. यामध्ये नरेंद्र मोदी देखील त्यांच्या टार्गेटवर होते. याप्रकरणी तिस्ता सेटलवाड, माजी आयपीएस अधिकारी आरबी श्रीकुमार आणि संजीव भट्ट यांना अटकही करण्यात आली होती.


दरम्यान, अशा प्रकारे एसआयटी काही लोकांच्या सांगण्यावरुन काम करत आहे. तसेच जे लोक सध्या हयात नाहीत त्यांच्यावर आरोप करुन त्यांचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे.

Comments
Add Comment

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ

पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

चालक परवान्याचे वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य

नवी दिल्ली  : चालक परवान्याची मुदत ज्या दिवशी संपते, त्याच दिवसापासून संबंधित व्यक्तीचा चालक म्हणून असलेला दर्जा

राजस्थानच्या फतेहपूर-माउंट अबूमध्ये तापमान ४ अंश सेल्सिअस

नवी दिल्ली  : उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेशसह ८ राज्यांमध्ये शनिवारी सकाळी कडाक्याच्या थंडीसह दाट