तिस्ता सेटलवाड, अहमद पटेलांनी रचला होता मोदींना अडकवण्याचा कट

अहमदाबाद : सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्यासह इतरांनी गुजरात दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अडकवण्याचा कट रचला होता, अशी माहिती विशेष तपास पथकाने सेशन्स कोर्टाला सांगितले. मोदींचे गुजरातमधील सरकार काहीही करुन पाडायचे, यासाठी हे कारस्थान रचल्याचेही एसआयटीने म्हटले आहे.


एसआयटीने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले यावेळी त्यांनी आरोपींच्या जामिनाला विरोध केला. जामिनाला विरोध करताना एसआयटी अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितले की, गुजरातची प्रतिमा खराब करण्यासाठी कट रचला गेला होता. यासाठी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचा सहभाग होता. ते तेव्हा राज्यसभा खासदार आणि काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार होते.


एसआयटीच्या चौकशी समितीने दावा केला आहे की, गुजरातमधील निवडून आलेले सरकार पाडणे हे सेटलवाड यांचे राजकीय ध्येय होते. विरोधी पक्षाकडून त्यांना यासाठी अवैध मार्गाने ३० लाख रुपये मिळाले होते. विरोधी पक्षाकडून सेटलवाड यांना गुजरातमधील विविध अधिकारी आणि निरपराध लोकांना विविध प्रकरणांमध्ये अडकवणे आणि त्यांच्यावर खटले चालवण्याचे त्या काम करत होत्या. यामध्ये नरेंद्र मोदी देखील त्यांच्या टार्गेटवर होते. याप्रकरणी तिस्ता सेटलवाड, माजी आयपीएस अधिकारी आरबी श्रीकुमार आणि संजीव भट्ट यांना अटकही करण्यात आली होती.


दरम्यान, अशा प्रकारे एसआयटी काही लोकांच्या सांगण्यावरुन काम करत आहे. तसेच जे लोक सध्या हयात नाहीत त्यांच्यावर आरोप करुन त्यांचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे.

Comments
Add Comment

ट्रम्प यांना पुन्हा आली भारताची आठवण, म्हणाले मोदी माझे चांगले मित्र

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी म्हणाले की त्यांना पूर्ण विश्वास आहे की

करिष्माच्या मुलांनाही हवाय हिस्सा; संजय कपूरच्या हजारो कोटींच्या संपत्तीचा वाद आता कोर्टात

नवी दिल्ली : प्रिया कपूरने संजय कपूर यांचे मृत्युपत्र नसल्याचा दावा केल्याचा आरोप मुलांनी केला आहे. त्यावेळी

उपराष्ट्रपती निवडणुकीत सी. पी. राधाकृष्णन यांचा दणदणीत विजय; विरोधकांची मते फुटली?

नवी दिल्ली: भारताला नवे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन मिळाले आहेत. उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे

शिक्षक भरतीवेळी महाविद्यालयाच्या आवारात दिसले महाकाय अजगर

अलवर : राजस्थानमधील अलवर येथे अनुदानीत वाणिज्य महाविद्यालयात वरिष्ठ शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होती. ही

२०४० मध्ये चंद्रावर भारतीय पाऊल पडणार

इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांचा विश्वास नवी दिल्ली : इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी चांद्रयान ४,

सियाचीनमध्ये भीषण हिमस्खलन : तीन भारतीय जवान शहीद !

नवी दिल्ली : लडाखमधील सियाचीन बेस कॅम्पवर झालेल्या हिमस्खलनात तीन भारतीय लष्करी जवान शाहिद झाले आहेत . बचाव