मुंबई पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठीचे हजारो टॅब धूळखात पडून

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खरेदी करण्यात आलेले टॅब धूळ खात पडले असून तब्बल १९ हजार ४०१ टॅब कपाटात पडून आहेत. तर असे असताना एक महिना उलटून गेला आहे. शाळा सुरू होऊन तरीही विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आलेले नाही.


मुंबई महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देता यावे यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी टॅब देण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. फेब्रुवारी २०२२ पासून कंत्राटदाराने विविध शाळांना टॅब देण्यास सुरुवात केली मात्र आतापर्यंत ९० टक्के टॅबचे विविध शाळांमध्ये वितरण झाल्याचे समोर आले आहे. तर यासाठी महापालिकेने ३८ कोटी रुपये खर्च केले असून पण हे टॅब अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना देण्यात आले नसल्याचे समोर आले आहे.


दरम्यान शिक्षकांनाही टॅबचे प्रशिक्षण नसल्यामुळे टॅबचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर पालिकेच्या बऱ्याच शाळांमध्ये वायफायची सुविधा नाही. तर दुसरीकडे ई-मेल आयडी पण टॅबमध्ये ॲड करण्यात आला नसल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र लिहून पालिका शिक्षण विभागाच्या या भोंगळ कारभाराकडे लक्ष वेधले आहे.


आधीच कोरोनामुळे दोन वर्ष मुंबई महापालिकेच्या शाळा बंद असताना ऑनलाइन शिक्षणासाठी टॅब विद्यार्थ्यांना देण्यात आले नाहीत. यामुळे जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही दराडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Comments
Add Comment

मुंबई आशियातील 'आनंदी' शहर!

टाइम आऊट सर्वेक्षणात पहिले स्थान; ८७% नागरिक खूश नवी दिल्ली: मुंबईला २०२५ साठी आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणून

गोराईत उभारले जाणार भारतातील पहिले मॅग्रोव्ह पार्क

उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांच्या पुढाकाराने साकारणार प्रकल्प मुंबई : भारतातील पहिले ‘मॅंग्रोव्ह-थीम

अमिताभ बच्चन यांनी विकले २ आलिशान फ्लॅट्स; १२ कोटींना झाला व्यवहार

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील गोरेगाव येथे असलेले त्यांचे दोन लक्झरी फ्लॅट्स विकले

मुंबई महापालिकेचे प्रभाग आरक्षण सोडत ११ नोव्हेंबर रोजी वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम जाहीर

मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलने ५ जणांना चिरडले!

मस्जीद बंदर रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना, रेल्वे कर्मचा-यांच्या आंदोलनाने घेतले बळी, दोष कुणाचा? मुंबई :

बीडीडीतील ८४६ रहिवाशांना आठवड्याभरात मिळणार घरे

पहिल्या टप्प्यातील पाच इमारती तयार मुंबई : बीडीडी चाळीतील रहिवाशांना गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर वरळीतील