शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार!

मुंबई : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. पहिल्या टप्प्यात १० मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे गटाचे पाच आणि भाजपचे पाच मंत्री शपथ घेणार असल्याचे समजते. हा शपथविधी येत्या १९ जुलै रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे.


अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आधी १० मंत्र्यांना शपथ देणार असून अधिवेशन संपले की दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता पहिल्या टप्प्यात कोणाला संधी मिळणार, हे पहावे लागणार आहे.


२५ जुलैपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्याआधी १८ जुलै रोजी राष्ट्रपतिपदाची निवडणूक आहे. राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक झाली की त्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाला वेग येणार आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.


या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी अनेक आमदारांचे प्रयत्न सुरू असून, शिंदे आणि फडणवीस यांच्यात राज्यात तसेच दिल्लीतही बैठका पार पडल्या आहेत. दिल्लीत अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यानही मंत्रीमंडळ विस्तारावर सविस्तर चर्चा झाल्याचे कळते. या बैठकीत मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, आता शपथविधी पार पडणार असल्याचे समजते.

Comments
Add Comment

थेट शर्यतीत पळणाऱ्या बैलांवर भानामती! कोल्हापूरातील स्मशानात आढळून आला अंधश्रद्धेचा प्रकार

कोल्हापूर: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील

घरगुती ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर नाही : मुख्यमंत्री

नागपूर : राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. मात्र, सामान्य

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारीला मुंबईत

नागपूर : नागपुरच्या गुलाबी थंडीत गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले. पुढील

मुंबईकरांना हक्काचं घर आणि विदर्भाला विकासाचं वैभव!

अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही "मुंबई फास्ट, महाराष्ट्र

मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे 'रेहमान डकैत' कोण..?

महानगरपालिका निवडणूक जिंकून महायुतीच ठरेल असली ' धुरंधर ' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती

Winter Session : पाच वर्षे एकही योजना बंद करणार नाही!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार मुंबई : “निवडणुका