शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार!

मुंबई : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. पहिल्या टप्प्यात १० मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे गटाचे पाच आणि भाजपचे पाच मंत्री शपथ घेणार असल्याचे समजते. हा शपथविधी येत्या १९ जुलै रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे.


अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आधी १० मंत्र्यांना शपथ देणार असून अधिवेशन संपले की दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता पहिल्या टप्प्यात कोणाला संधी मिळणार, हे पहावे लागणार आहे.


२५ जुलैपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्याआधी १८ जुलै रोजी राष्ट्रपतिपदाची निवडणूक आहे. राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक झाली की त्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाला वेग येणार आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.


या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी अनेक आमदारांचे प्रयत्न सुरू असून, शिंदे आणि फडणवीस यांच्यात राज्यात तसेच दिल्लीतही बैठका पार पडल्या आहेत. दिल्लीत अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यानही मंत्रीमंडळ विस्तारावर सविस्तर चर्चा झाल्याचे कळते. या बैठकीत मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, आता शपथविधी पार पडणार असल्याचे समजते.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी