रत्नागिरीचा भावी खासदार भाजपचाच; आशिष शेलार

रत्नागिरी (हिं.स.) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा भावी खासदार भाजपचाच असेल, असा ठाम विश्वास भाजपचे नेते आशीष शेलार यांनी रत्नागिरी दौऱ्याच्या वेळी व्यक्त केला. शेलार दोन दिवसांच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत.


यावेळी त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी भाजपाची पुढची रणनिती स्पष्ट केली. शेलार म्हणाले, यापुढे काँग्रेस राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र लढले तरी त्याचा कोणताही परिणाम भाजपावर होणार नाही.


दरम्यान, माजी मंत्री आमदार उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी होणाऱ्या तथाकथित भेटीच्या वृत्ताचे खंडन केले. रत्नागिरी शहरातील एका व्हॉट्सअप ग्रुपवर शेलार आज दुपारी साडेतीन वाजता सामंत यांची त्यांच्या पाली येथील निवासस्थानी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताचे शेलार यांनी खंडन केले. अशा प्रकारची कुठलीच भेट झालेली नाही किंवा ठरलेलीही नाही, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

राज्यात लवकरच ‘धर्मांतरबंदी कायदा’ - गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचे संकेत; मदरशांची होणार सखोल पडताळणी

मुंबई : प्रलोभने दाखवून किंवा बळजबरीने केल्या जाणाऱ्या धर्मांतराच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची अशी झाली निवड

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी

सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष, आवाजी मतदानाने निवड

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मुंबईत वरळीच्या डोममधील हॉलमध्ये बैठक झाली. या

जिल्हा नियोजन निधी भूगोलावर ठरवू नका, त्या-त्या जिल्ह्याच्या प्रत्यक्ष गरजा लक्षात घ्या! - आमदार निलेश राणे विधानसभेत कडाडले

लहान जिल्ह्यांना सरसकट ५०० कोटी, तर मोठ्या जिल्ह्यांना १ हजार कोटींचा निधी द्या मुंबई : "जिल्हा नियोजन निधी केवळ

११ वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तिपटीने वाढवली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील विरोधी पक्ष भ्रमित आणि संभ्रमित असल्याचा टोला मुंबई : "महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०१२-१३ साली १३ लाख

महाराष्ट्राची विकासयात्रा थांबणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत ग्वाही

मुंबई : राज्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले अडथळ्यांचे राजकारण आता पूर्णपणे संपले असून, महाराष्ट्र