रत्नागिरीचा भावी खासदार भाजपचाच; आशिष शेलार

  107

रत्नागिरी (हिं.स.) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा भावी खासदार भाजपचाच असेल, असा ठाम विश्वास भाजपचे नेते आशीष शेलार यांनी रत्नागिरी दौऱ्याच्या वेळी व्यक्त केला. शेलार दोन दिवसांच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत.


यावेळी त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी भाजपाची पुढची रणनिती स्पष्ट केली. शेलार म्हणाले, यापुढे काँग्रेस राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र लढले तरी त्याचा कोणताही परिणाम भाजपावर होणार नाही.


दरम्यान, माजी मंत्री आमदार उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी होणाऱ्या तथाकथित भेटीच्या वृत्ताचे खंडन केले. रत्नागिरी शहरातील एका व्हॉट्सअप ग्रुपवर शेलार आज दुपारी साडेतीन वाजता सामंत यांची त्यांच्या पाली येथील निवासस्थानी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताचे शेलार यांनी खंडन केले. अशा प्रकारची कुठलीच भेट झालेली नाही किंवा ठरलेलीही नाही, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

'उद्धव सरकारनेच त्रिभाषा सक्तीचा निर्णय घेतला'

मुंबई : महाराष्ट्रातील शाळांमध्ये त्रिभाषा सक्तीचा निर्णय उद्धव सरकारनेच २७ जानेवारी २०२२ रोजी घेतला होता. डॉ.

हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही

आदित्य ठाकरेची अटक टाळण्यासाठी हैद्राबादवरुन आणला मांत्रिक!

शिवसेना नेते रामदास कदम यांचा आरोप मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत वाद आता काळी विद्या, जादूटोणा आणि तांत्रिक

Dycm Eknath Shinde: कोल्हापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसला 'जबर' धक्का

कोल्हापूर मनपातील २५ माजी नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेतील २५ माजी

पुण्यात उबाठाला धक्का, महादेव बाबर करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

पुणे: पुण्यातल्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर येत आहे. उबाठा गटाचे माजी आमदार महादेव बाबर (Mahadev Babar) अजित

मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका! गंभीर आरोप करत 'या' नेत्याने सोडली साथ

"मला जाणूनबुजून पक्षातून डावलले जात होते, माझ्यावर हसत राहिले" केले अनेक आरोप नागपूर: स्थानिक स्वराज संस्थांच्या