रत्नागिरीचा भावी खासदार भाजपचाच; आशिष शेलार

रत्नागिरी (हिं.स.) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा भावी खासदार भाजपचाच असेल, असा ठाम विश्वास भाजपचे नेते आशीष शेलार यांनी रत्नागिरी दौऱ्याच्या वेळी व्यक्त केला. शेलार दोन दिवसांच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत.


यावेळी त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी भाजपाची पुढची रणनिती स्पष्ट केली. शेलार म्हणाले, यापुढे काँग्रेस राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र लढले तरी त्याचा कोणताही परिणाम भाजपावर होणार नाही.


दरम्यान, माजी मंत्री आमदार उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी होणाऱ्या तथाकथित भेटीच्या वृत्ताचे खंडन केले. रत्नागिरी शहरातील एका व्हॉट्सअप ग्रुपवर शेलार आज दुपारी साडेतीन वाजता सामंत यांची त्यांच्या पाली येथील निवासस्थानी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताचे शेलार यांनी खंडन केले. अशा प्रकारची कुठलीच भेट झालेली नाही किंवा ठरलेलीही नाही, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

मुंबईत उद्धव समर्थक आणि भाजपचे एकमेकांविरोधात बॅनरयुद्ध

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा विजय झाला. यानंतर भाजपचे मिशन मुंबई लगेच सुरू झाले आहे. बिहारमध्ये

बिहारनंतर पश्चिम बंगालमधील जंगलराज उखडून टाकू!

पंतप्रधान मोदींचे विजयसभेत ‘बंगाल’साठी एल्गार नवी दिल्ली  : काँग्रेसकडे देशासाठी कोणताही सकारात्मक दृष्टिकोन

अरुण गवळींची दुसरी कन्याही राजकारणात

भायखळ्यातून महापालिका निवडणूक लढवणार सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सन

बिहार निकालानंतर महाराष्ट्रात काँग्रेसचा ‘एकला चलो रे’चा नारा

मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत मुंबई  : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच

बिहार निवडणूक पराभवाचा फटका: रोहिणी आचार्यने RJD आणि कुटुंबाचा त्याग केला

मुंबई : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत RJD च्या मोठ्या पराभवानंतर लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबात तणाव वाढला आहे.

“जो जीता वही सिकंदर” शरद पवारांच्या बिनबुडाच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार!

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र समोर