रत्नागिरीचा भावी खासदार भाजपचाच; आशिष शेलार

रत्नागिरी (हिं.स.) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा भावी खासदार भाजपचाच असेल, असा ठाम विश्वास भाजपचे नेते आशीष शेलार यांनी रत्नागिरी दौऱ्याच्या वेळी व्यक्त केला. शेलार दोन दिवसांच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत.


यावेळी त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी भाजपाची पुढची रणनिती स्पष्ट केली. शेलार म्हणाले, यापुढे काँग्रेस राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र लढले तरी त्याचा कोणताही परिणाम भाजपावर होणार नाही.


दरम्यान, माजी मंत्री आमदार उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी होणाऱ्या तथाकथित भेटीच्या वृत्ताचे खंडन केले. रत्नागिरी शहरातील एका व्हॉट्सअप ग्रुपवर शेलार आज दुपारी साडेतीन वाजता सामंत यांची त्यांच्या पाली येथील निवासस्थानी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताचे शेलार यांनी खंडन केले. अशा प्रकारची कुठलीच भेट झालेली नाही किंवा ठरलेलीही नाही, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरे यांच्यानंतर कोण होणार होते मुख्यमंत्री ? नितेश राणेंनी केला गौप्यस्फोट

पिंपरी : ‘विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी बेईमानी करून काँग्रेस सोबत जाऊन सरकार स्थापन

दिल्लीत राज ठाकरेंच्या नातवाचे पंतप्रधान मोदींनी केले लाड

नवी दिल्ली : दिल्लीत राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्या मेव्हण्याचे डॉ. राहुल बोरुडे यांचे लग्न झाले. डॉ. राहुल

नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर, अंबरनाथमध्ये शिवसेनेला दिलासा; भाजपाला मोठा धक्का

अंबरनाथ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची मानली जाणारी अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत ६७.६३ टक्के मतदान

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी मतदान

महाराष्ट्र ‘राजभवन; झाले आता ‘लोकभवन’

मुंबई : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे

सर्व नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला

मुंबई : राज्यातील सर्व २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च