राज्यात पावसामुळे आतापर्यंत ९९ जणांचा मृत्यू

Share

मुंबई : राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने राज्याच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली. या पावसात आतापर्यंत ९९ जणांचा बळी गेला आहे तर १८१ जनावरं दगावली आहेत. तर आजवर ७ हजार ९६३ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

आज पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे. पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतही पावसाने विश्रांती घेतली आहे, त्यामुळे लोकल वाहतूक आणि रस्ते मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे.

तिकडे गुजरातमध्येही पावसाने विश्रांती घेतल्याने पूर ओसरला आहे. परिणामी मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पाणी कमी झाले आहे. त्यामुळे या मार्गावर बंद असलेली वाहतूक पुन्हा एकदा सुरु झाली आहे.

खबरदारी म्हणून विविध जिल्ह्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं तैनात

दरम्यान, मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात आहे. पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये या आधीच तैनात केल्या आहेत. राज्यात विविध जिल्ह्यात एकूण १४ एनडीआरएफ आणि ६ एसडीआरएफ पथकं तैनात आहेत.

Recent Posts

प्रभासच्या नायिकेवर पाकिस्तानी सैन्याशी संबंध असल्याचा आरोप, पोस्ट शेअर करत म्हणाली- माझा कोणताही संबंध नाही

पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…

8 minutes ago

Maharashtra Weather : सूर्य आग ओकणार! ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…

26 minutes ago

INS सूरतवरुन यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…

39 minutes ago

भारतात होणारी दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा पुढे ढकलली

कोलकाता : पहलगाममध्ये मंगळवारी(दि.२२) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जूनमध्ये भारतात होणारी दक्षिण आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित…

43 minutes ago

Fawad Khan : पहलगाम हल्ल्यानंतर सरकारचा अ‍ॅक्शन मोड! फवाद खानच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटावर घातली बंदी

मुंबई : पहलगाम हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट…

1 hour ago

Pahalgam Terror Attack: खारट फ्राईड राईसने वाचवला ११ जणांचा जीव

जम्मू काश्मीरला फिरायला गेलेल्या एका कुटुंबासाठी खारट फ्राइड राईस जीवदान ठरले मुंबई: पहलगामच्या बैसारण येथे…

2 hours ago