राज्यात पावसामुळे आतापर्यंत ९९ जणांचा मृत्यू

  79

मुंबई : राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने राज्याच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली. या पावसात आतापर्यंत ९९ जणांचा बळी गेला आहे तर १८१ जनावरं दगावली आहेत. तर आजवर ७ हजार ९६३ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.


आज पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे. पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतही पावसाने विश्रांती घेतली आहे, त्यामुळे लोकल वाहतूक आणि रस्ते मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे.


तिकडे गुजरातमध्येही पावसाने विश्रांती घेतल्याने पूर ओसरला आहे. परिणामी मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पाणी कमी झाले आहे. त्यामुळे या मार्गावर बंद असलेली वाहतूक पुन्हा एकदा सुरु झाली आहे.


खबरदारी म्हणून विविध जिल्ह्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं तैनात


दरम्यान, मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात आहे. पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये या आधीच तैनात केल्या आहेत. राज्यात विविध जिल्ह्यात एकूण १४ एनडीआरएफ आणि ६ एसडीआरएफ पथकं तैनात आहेत.

Comments
Add Comment

चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार

Prasad Tamdar Baba : अंग चोळून अंघोळ अन् शरीरसंबंध; भोंदूबाबा प्रसादचे हायटेक कारनामे उघड

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलच्या

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये