सनदी लेखापाल परीक्षेत मुंबईचा मीत शहा देशात पहिला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सनदी लेखापाल परीक्षेत मुंबईचा मीत शहा देशात पहिला आला आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला. त्यात मुंबईच्या मीत शहाने ८०.२५ टक्के देशात पहिला क्रमांक मिळवला असून, दोन्ही ग्रुपच्या परीक्षेचा निकाल १२.५९ टक्के लागला.


आयसीएआयने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. अंतिम परीक्षा मे महिन्यात घेण्यात आली होती. ग्रुप एकचा निकाल २१.९९ टक्के लागला. त्यात परीक्षा दिलेल्या ६६ हजार ५७५ विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ६४३ उमेदवार उत्तीर्ण झाले. ग्रुप दोनचा निकाल २१.९४ टक्के निकाल लागला. परीक्षा दिलेल्या ६३ हजार २५३ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ८७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर दोन्ही ग्रुपची परीक्षा दिलेल्या २९ हजार ३४८ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ६९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जयपूरच्या अक्षत गोयलने ७९.८८ टक्के गुणांसह देशात द्वितीय, तर सुरतच्या सृष्टी संघवीने ७६.३८ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.


या वेळी तपासणी पद्धतीमध्ये अधिक सुधारणा करून अत्यंत कमी कालावधीमध्ये अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. आजच्या काळात सनदी लेखापालांना मोठी मागणी निर्माण झाली आहे, असे आयसीएआयच्या केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे यांनी सांगितले.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मीत शहाचे कौतुक


राष्ट्रीय स्तरावरील सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकाऊंटन्ट (सीए) परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या मुंबईच्या मीत शहाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.


''मीत यांचे हे यश करिअरच्या वेगवेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या होतकरू तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. पारंपारिक आणि नेहमीच्या अशा क्षेत्रांबरोबरच सनदी लेखापाल हे क्षेत्र व्यापार, उद्योग या क्षेत्रासाठी महत्वपूर्ण आहे. त्यामध्ये मीत यांनी घवघवीत यश मिळवणे हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या यशात शहा कुटुंबियांचे पाठबळही महत्वपूर्ण ठरले असेल, त्यासाठी शहा कुटुंबियांचेही अभिनंदन'' असे कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Comments
Add Comment

बिहार निवडणूक 2025 : फिलोदी सट्टा बाजारानं निवडणुकीच्या निकालाविषयी केलं भाकीत

पाटणा : बिहारमध्ये निवडणुकीचं तापमान चढलं असलं तरी सगळ्यांची नजर आता राजस्थानच्या प्रसिद्ध फिलोदी सट्टा

महामार्गांवर असणार आता ठेकेदारांच नाव आणि पत्ताही

नवी दिल्ली : आता प्रत्येक महामार्गाच्या सर्व एन्ट्री पॉइंटवर सहज दिसेल असा मोठा फलक लावला जाईल. या फलकावर संबंधित

Ayodhya Ram Mandir : २५ नोव्हेंबरला राम मंदिरात भाविकांसाठी 'नो एन्ट्री'! अयोध्या सोहळ्यासाठी ८ हजार निमंत्रणे; PM मोदी उपस्थित राहणार!

नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराचे (Ram Janmabhoomi Temple) अपूर्ण राहिलेले काम अलीकडेच पूर्ण झाल्याची घोषणा

लग्नात नववधूने फक्त तीनच सोन्याचे दागिने परिधान करावे, पंचायतीचे निर्देश

उत्तराखंड : दिवसेंदिवस सोन्याच्या आणि चांदीच्या किमती या गगनाला भिडत आहेत. भारतीय परंपरेनुसार आपण बहुतेक

बंगळुरूतील धक्कादायक घटना, जोडप्याने भरधाव वेगाने पाठलाग केला आणि...

बंगळुरू : कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे एक धक्कादायक घटना घडली. रस्त्यावरुन वेगाने जात असलेल्या एका कारला एका

'मोंथा' चक्रीवादळामुळे ब्रिटीशकालीन जहाज आले किनाऱ्याजवळ!

ओडिशा: 'मोंथा' चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला आहे. लाटांचा जोर वाढला आहे. या लाटांच्या जोराने एका जहाजाचा सांगाडा