फडणवीसांनी 'यासाठी' घेतली राज ठाकरेंची भेट!

मुंबई : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवारी) शिवतीर्थवर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. गेल्या महिन्यात राज ठाकरेंवर हिपबोनची शस्त्रक्रिया झाली होती. त्या पार्श्वभूमीवरच फडणवीस यांनी ठाकरेंची सदिच्छा भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. पण या भेटीच्या निमित्ताने राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. विशेषत: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर चर्चा झाल्याची दाट शक्यता आहे.


राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर राज ठाकरे यांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याआधी राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्याने ते भाजपच्या बाजूने झुकल्याची चर्चा होतीच. राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी भाजपच्या राहुल नार्वेकर यांना मत दिले होते. तर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांना कौतुक करणारे पत्र पाठवले होते.


यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर त्यात मनसेला देखील वाटा मिळेल अशी चर्चा सुरू झाली होती.


राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मंत्रिपद दिले जाईल असे वृत्त समोर येत होते. राज्य मंत्रिमंडळात अमित ठाकरेंचा समावेश केला जाईल ही बातमी खोटी होती असे राज ठाकरे यांनी या भेटीत पुन्हा एकदा स्पष्ट केले.


अशाच आजच्या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली यावर अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत.

Comments
Add Comment

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

मुंबई : सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांना

फुलांची होळी उपक्रमातून महापौर रितू तावडे यांनी दिला पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश

मुंबई : होळी व धुळवड/रंगपंचमी हे सण आनंदात साजरे करावेत आणि त्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे सामाजिक

दोन महिन्यांत राज्यातील सव्वा कोटी नागरिकांची आरोग्य तपासणी

आरोग्य जागर : सिकलसेलपासून कर्करोगापर्यंतच्या मोहिमांना मोठे यश मुंबई : राज्यातील जनतेचे आरोग्य सुदृढ

राज्यातील अकुशल कामगारांच्या थकीत मजुरीचा प्रश्न सुटला

मनरेगा अंतर्गत १ हजार १६८ कोटींचा निधी मंजूर; होळीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा श्रमिकांना मोठा दिलासा मुंबई :

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार

दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था

मुंबई : इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद पडल्याने दुबईसह