कन्हैय्यालालच्या मुलांना मिळणार सरकारी नोकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानच्या उदयपुरमध्ये २८ जून रोजी झालेल्या घटनेमध्ये कन्हैय्यालाल नावाच्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. नुपूर शर्मा प्रकरणाशी या हत्येचा संबंध जोडला जात होता. या व्यक्तीच्या मुलांना आता सरकारी नोकरी देण्यात आली आहे.


राज्य सरकारने ही घोषणा केली असून याबद्दलचा आदेशही जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार कन्हैय्यालालची दोन्ही मुले यश आणि तरुण यांना उदयपूरमधल्या कोष कार्यालयात कनिष्ठ सहाय्यक पदावर भरती करुन घेण्यात आले आहे. या दोघांनाही एक महिन्यामध्ये कामावर येण्यास सांगितले आहे. जिल्हाधिकारी ताराचंद मीना यांनी हे आदेश दिले आहे. यामध्ये काही अटीही घालण्यात आल्या आहे.


कामावर रुजू झालेल्या दिवसापासून दोन वर्षे हे दोघेही प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतील. या काळात त्यांना १४६०० रुपये पगार मिळेल आणि त्यानंतर २,४०० ग्रेड पेनुसार पगार मिळेल. प्रशिक्षण काळात या दोघांना महागाई भत्ता, विशेष वेतन, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, बोनस अशा प्रकारच्या कोणत्याही सुविधा मिळणार नाहीत. या काळात या दोघांच्या राज्य विम्यात कोणतीही कपात केली जाणार नाही. प्रशिक्षण काळ पूर्ण झाल्यानंतर पगारवाढीसाठी यांना परीक्षा द्यावी लागेल. नाहीतर त्यांची नोकरी जाईल.

Comments
Add Comment

भयंकर धक्कादायक! दिवाळीत 'कार्बाइड गन'मुळे १४ मुलांना कायमचे अंधत्व; १२५ हून अधिक जखमी!

भोपाळ : दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे वेगवेगळे ट्रेंड समोर येत असातात, यामध्ये चकरीपासून ते रॉकेटपर्यंत वेगवेगळे

सैन्यासाठी ७९,००० कोटींचे मोठे निर्णय!

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने आज भारतीय

देशभरात मतदार यादी बनवण्याचे मोठे काम सुरू!

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडूत सर्वप्रथम एसआयआर प्रक्रिया नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने देशभरातील

महिला आणि ट्रान्सजेंडरसाठी मोफत प्रवास; काय आहे 'सहेली स्मार्ट कार्ड' योजना?

नवी दिल्ली : भाऊबीजच्या निमित्ताने दिल्ली सरकार महिला आणि ट्रान्सजेंडर लोकांना एक मोठी भेट देणार आहे. आजपासून

तेजस्वी यादव '४२०' आरोपी, त्यांच्याकडे विश्वासार्हताच नाही, बिहारला मोदी-नितीश यांचे 'डबल इंजिन' सरकारच हवे!; रवी शंकर प्रसाद यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप खासदार रवी शंकर प्रसाद यांनी आज महागठबंधनचे

आता विक्रीआधी होणार प्रत्येक औषधाची सखोल तपासणी

नवी दिल्ली : लहान मुलांना खोकला झाल्यावर औषध म्हणून दिल्या जाणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मध्य प्रदेशमध्ये २४