कन्हैय्यालालच्या मुलांना मिळणार सरकारी नोकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानच्या उदयपुरमध्ये २८ जून रोजी झालेल्या घटनेमध्ये कन्हैय्यालाल नावाच्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. नुपूर शर्मा प्रकरणाशी या हत्येचा संबंध जोडला जात होता. या व्यक्तीच्या मुलांना आता सरकारी नोकरी देण्यात आली आहे.


राज्य सरकारने ही घोषणा केली असून याबद्दलचा आदेशही जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार कन्हैय्यालालची दोन्ही मुले यश आणि तरुण यांना उदयपूरमधल्या कोष कार्यालयात कनिष्ठ सहाय्यक पदावर भरती करुन घेण्यात आले आहे. या दोघांनाही एक महिन्यामध्ये कामावर येण्यास सांगितले आहे. जिल्हाधिकारी ताराचंद मीना यांनी हे आदेश दिले आहे. यामध्ये काही अटीही घालण्यात आल्या आहे.


कामावर रुजू झालेल्या दिवसापासून दोन वर्षे हे दोघेही प्रशिक्षणार्थी म्हणून काम करतील. या काळात त्यांना १४६०० रुपये पगार मिळेल आणि त्यानंतर २,४०० ग्रेड पेनुसार पगार मिळेल. प्रशिक्षण काळात या दोघांना महागाई भत्ता, विशेष वेतन, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, बोनस अशा प्रकारच्या कोणत्याही सुविधा मिळणार नाहीत. या काळात या दोघांच्या राज्य विम्यात कोणतीही कपात केली जाणार नाही. प्रशिक्षण काळ पूर्ण झाल्यानंतर पगारवाढीसाठी यांना परीक्षा द्यावी लागेल. नाहीतर त्यांची नोकरी जाईल.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे