मुंबईत साथीच्या आजारांचे थैमान

सीमा दाते


मुंबई : मुंबईत एकीकडे कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी साथीच्या आजारांनी मात्र थैमान घातले आहे. मुंबईत सध्या गॅस्ट्रो, मलेरिया आणि लेप्टोची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांवरील रुग्णांना नियंत्रणात आणण्याचे आव्हान पालिकेच्या आरोग्य विभागासमोर आहे.


दरवर्षी मुंबई पावसाळ्यापूर्वी साथीचे आजार होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते, विविध उपाययोजना केल्या जातात. यंदाही पालिकेकडून विविध उपाययोजना केल्या असल्या तरी सध्या मुंबईत गॅस्ट्रो आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्याच्या केवळ १० दिवसांत लेप्टोचे ५ रुग्ण आढळले आहेत. यामुळे सध्या चिंतेचे वातावरण आहे.



मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्याच्या १० दिवसांतच मलेरियाचे ११९ तर गॅस्ट्रोचे १७६ रुग्ण आढळले आहेत. केवळ १० दिवसांत एवढे रुग्ण आढळल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. जूनच्या संपूर्ण महिन्यात मलेरियाचे ३५० आणि गॅस्ट्रोचे ५४३ रुग्ण आढळले होते. त्यातच महिनाभरात लेप्टोचे १२ रुग्ण होते तर आता केवळ १० दिवसांत ५ रुग्ण आढळले आहेत. त्या पाठोपाठ डेंग्यूचे १९ तर हेपटायटीसचे २३ रुग्ण आढळले आहेत.


विशेष म्हणजे सध्या पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात लेप्टोचा प्रसार वेगाने होत असतो. यासाठी नागरिकांना खबरदारी घेण्यास पालिकेकडून सांगितले आहे. साचलेल्या पाण्यात जाऊ नये, ताप आल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घ्यावे असे पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. महापालिकेकडून ३,४४,२९१ घरांतील सर्वेक्षण देखील करण्यात आले होते. यावेळी साचलेल्या पाण्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने

हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या

महापौर, उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडूनही उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून यासाठी शनिवारी ०७