मुंबईत साथीच्या आजारांचे थैमान

सीमा दाते


मुंबई : मुंबईत एकीकडे कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी साथीच्या आजारांनी मात्र थैमान घातले आहे. मुंबईत सध्या गॅस्ट्रो, मलेरिया आणि लेप्टोची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांवरील रुग्णांना नियंत्रणात आणण्याचे आव्हान पालिकेच्या आरोग्य विभागासमोर आहे.


दरवर्षी मुंबई पावसाळ्यापूर्वी साथीचे आजार होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते, विविध उपाययोजना केल्या जातात. यंदाही पालिकेकडून विविध उपाययोजना केल्या असल्या तरी सध्या मुंबईत गॅस्ट्रो आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्याच्या केवळ १० दिवसांत लेप्टोचे ५ रुग्ण आढळले आहेत. यामुळे सध्या चिंतेचे वातावरण आहे.



मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्याच्या १० दिवसांतच मलेरियाचे ११९ तर गॅस्ट्रोचे १७६ रुग्ण आढळले आहेत. केवळ १० दिवसांत एवढे रुग्ण आढळल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. जूनच्या संपूर्ण महिन्यात मलेरियाचे ३५० आणि गॅस्ट्रोचे ५४३ रुग्ण आढळले होते. त्यातच महिनाभरात लेप्टोचे १२ रुग्ण होते तर आता केवळ १० दिवसांत ५ रुग्ण आढळले आहेत. त्या पाठोपाठ डेंग्यूचे १९ तर हेपटायटीसचे २३ रुग्ण आढळले आहेत.


विशेष म्हणजे सध्या पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात लेप्टोचा प्रसार वेगाने होत असतो. यासाठी नागरिकांना खबरदारी घेण्यास पालिकेकडून सांगितले आहे. साचलेल्या पाण्यात जाऊ नये, ताप आल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घ्यावे असे पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. महापालिकेकडून ३,४४,२९१ घरांतील सर्वेक्षण देखील करण्यात आले होते. यावेळी साचलेल्या पाण्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन