वसईत दरड कोसळली; दोघांची सुटका, दोघे अडकले

वसई : वसईच्या भोयदापाडा राजवली याठिकाणी आज सकाळच्या सुमारास अचानक डोंगराचा काही भाग घरावर कोसळल्याने ४ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना घडली. यातील दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. परंतु दोघेजण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.


दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यातच वसई पूर्वेकडील राजावली येथे अचानक दरड घरावर कोसळली व नागरिक अडकले. हे ठिकाण अडगळीचे असल्याने जेसीबी व अन्य यंत्रणा याठिकाणी जाऊ शकत नसल्याने अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत पहारीच्या सहाय्याने दगड बाजूला करण्याचे काम केले जात आहे.


दोन नागरिकांना सुखरूप काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली. मात्र अद्याप शासकीय अधिकारी घटनास्थळी आले नाहीत या सर्व प्रकाराला महापालिका जबाबदार आहे, असा आरोप मनसेचे पदाधिकारी जयेंद्र पाटील यांनी केला.

Comments
Add Comment

एटीएसची इब्राहिम अबिदी याच्या मुंब्रा अन् कुर्ला येथील घरावर धाड

नवी दिल्ली  : पुण्यातील अल कायदा प्रकरणाचे धागेदोरे आता मुंब्र्यापर्यंत पोहोचले आहेत. पुणे एटीएसने सॉफ्टवेअर

उद्या आणि परवा मुंबईत पाणीबाणी!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेची १२०० मिलिमीटर व्यासाची जुनी तानसा, १२०० मिलिमीटर व्यासाची नवीन तानसा आणि ८००

महाराष्ट्रात केवळ मोजक्या पक्षांकडे राखीव निवडणूक चिन्ह

राष्ट्रीय, राज्यस्तरीय वगळता छोट्या पक्षांची होणार दमछाक मुंबई  : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

माहिममध्ये उबाठाकडे मनसेची खुल्या प्रभागांची मागणी, पाच पैंकी तीन खुले प्रभाग आपल्याकडे घेण्याचा मनसेचा विचार

मुंबई (सचिन धानजी):  मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया पार पडल्यानंतर आता

पिसे पांजरापूर येथे ९१० दशलक्ष लिटर प्रतीदिन क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र उभारणार, आता केंद्राची क्षमता होणार १८२० दशलक्ष लिटर

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईकरांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी धरणातून आलेल्या पाण्यावर भांडुप संकुल आणि

मुंबईतील अनधिकृत बांधकामांसाठी तक्रारींसाठी डॅशबोर्ड, महापालिकेने संस्थेची केली नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईतील अतिक्रमण हटवण्यासाठी आता महापालिकेच्यावतीने ट्रॅकींग सिस्टीम राबवण्यात येणार