वसई : वसईच्या भोयदापाडा राजवली याठिकाणी आज सकाळच्या सुमारास अचानक डोंगराचा काही भाग घरावर कोसळल्याने ४ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना घडली. यातील दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. परंतु दोघेजण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यातच वसई पूर्वेकडील राजावली येथे अचानक दरड घरावर कोसळली व नागरिक अडकले. हे ठिकाण अडगळीचे असल्याने जेसीबी व अन्य यंत्रणा याठिकाणी जाऊ शकत नसल्याने अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत पहारीच्या सहाय्याने दगड बाजूला करण्याचे काम केले जात आहे.
दोन नागरिकांना सुखरूप काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली. मात्र अद्याप शासकीय अधिकारी घटनास्थळी आले नाहीत या सर्व प्रकाराला महापालिका जबाबदार आहे, असा आरोप मनसेचे पदाधिकारी जयेंद्र पाटील यांनी केला.
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…