मकरसंक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये ?


मुंबई : हिंदू धर्मामध्ये मकरसंक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. मकरसंक्रांत हा सण दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला येतो. यंदा हा सण बुधवार १४ जानेवारी २०२६ रोजी साजरा होत आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणूनच याला मकरसंक्रांत असे म्हणतात. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना तिचा अक्ष कललेला असतो, त्यामुळे मकरसंक्रांतीपासून उत्तर गोलार्धात सूर्याची किरणे अधिक काळ पडू लागतात. दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. जाणून घ्या मकरसंक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये ?


यंदा बुधवार १४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंतचा काळ हा पुण्यकाळ आहे.


मकरसंक्रांतीच्या दिवशी ओळखीतल्या व्यक्तींना तसेच ज्यांच्याशी नव्याने ओळख करुन घेत आहात अशा सर्वांना तिळगूळ द्या. तिळगूळ देताना "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला" असे म्हणा. सर्व जुने वाद, कटुता आणि राग विसरून सर्वांशी प्रेमाने आणि गोडव्याने वागा.


शक्य असल्यास सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर तीळ मिश्रीत पाण्याने स्नान करा. हे स्नान करण्याआधी तिळाच्या तेलाने शरीराला मालीश करा तसेच तीळ मिश्रीत उटणे शरीराला लावा. नंतर स्नान करा. स्नान केल्यानंतर इष्ट देवतेचे स्मरण करा. शक्य असल्यास चालत जवळच्या मंदिरात जाऊन देवदर्शन करा. यानंतर यथाशक्ती दानधर्म करा. शक्य असल्यास रक्तदान करा.



मकरसंक्रांतीच्या दिवशी काय करू नये ?


कठोर बोलू नये. वाद घालू नये. कटुता निर्माण होईल असे वागू नये. कोणावरही संतापू नये. वृश्रतोड करू नये. प्राणीपक्षी यांना त्रास देऊ नये. शरीराला अपायकारक असलेली व्यसनं करू नये.



लक्षात ठेवा


मकरसंक्रांत हा सण आहे. हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करा. सूर्याचा मकर राशीतला प्रवेश तसेच दिवस मोठा होणे आणि रात्र लहान होणे हे एक निसर्गचक्र आहे. यात काहीही अशुभ असे नाही.


Comments
Add Comment

Weastern Railway : पश्चिम रेल्वेकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण

मुंबई : पश्चिम रेल्वेने आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेसाठी व्यापक तयारी पूर्ण केली

अपघातग्रस्त कामगारांच्याबाबत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या तातडीसाठी उपाययोजना करा; कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई : राज्यातील कारखान्यांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन हात गमावावा

Forest Minister Ganesh Naik : मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी १ हजार गावांमध्ये 'एआय अर्लट' यंत्रणा

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; २६० कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी मुंबई : राज्यातील वाढता मानव व वन्यजीव

Revenue Minister Bawankule : चाऱ्यासाठी सरकारी जमिनीवर आता गवत लागवड!

 बचत गट आणि बेरोजगार संस्थांशी भाडेकरार ; महसूलमंत्री बावनकुळे यांची महत्त्वाकांक्षी योजना मुंबई : गाव,

State President Ravindra Chavan : विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी भाजपकडून ४८ नावांची यादी तयार

दिल्लीत होणार शिक्कामोर्तब; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण केंद्रीय गृहमंत्री, राष्ट्रीय अध्यक्षांची भेट

८९ हजार कोटींच्या ५ प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२० हजार रोजगार निर्माण होणार; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी मुंबई :