बंडखोरांपुढे शिवसेना हतबल! जाहीर केला द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा

मुंबई : बंडखोरांपुढे हतबल झालेल्या शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदारांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. यासंदर्भात मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या खासदारांनी व्यक्त केलेल्या इच्छेची दखल घेत शिवसेनेने मुर्मूंना पाठिंबा घेण्याचा निर्णय घेतल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.


शिवसेनेतील ४० आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेचे १८ पैकी १४ खासदारही एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची दाट शक्यता आहे. तर पुढील आठवड्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणुक होत आहे. शिवसेनेच्या खासदारांनी ठाकरे यांच्यावर मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी दबाव आणला होता. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदारांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याची मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि राजेंद्र गावित यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला ७ खासदार गैरहजर होते. या बैठकीत मुर्मू या महिला आहेत व आदिवासी समाजाच्या आहेत. मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांची तुलना करता मुर्मू यांनाच पाठिंबा देणे उचित ठरेल, असे स्पष्ट मत खासदारांनी व्यक्त केले. यामुळे राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतल्याचे राऊत यांनी सांगितले.


महाराष्ट्रात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी क्षेत्रात काम करणारे अधिक शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. बैठकी दरम्यान प्रत्येकाची मतं समजून घेतली. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला म्हणजे भाजपला पाठिंबा दिला असे नाही. यशवंत सिन्हा तेही विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांनाही आमच्या सद् भावना आहेत. कारण देशामध्ये एकी पाहिजे. हे जरी खर असले तरी अनेकदा अशा निवडणुकासंदर्भात एक लोक भावना काय आहेत. ते पाहून हा निर्णय घ्यावा लागतो, असे राऊत यांनी सांगितले.


यापूर्वीसुद्धा एनडीएत असून देखील शिवसेनेने प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. कारण प्रतिभा ताई पाटील पहिली महाराष्ट्राची मराठी महिला होत्या. त्यामुळे शिवसेनेला अशा प्रकारची निर्णय घेण्याची एक परंपरा असल्याचे राऊत यांनी सांगितले.

Comments
Add Comment

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा