बंडखोरांपुढे शिवसेना हतबल! जाहीर केला द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा

मुंबई : बंडखोरांपुढे हतबल झालेल्या शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदारांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. यासंदर्भात मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या खासदारांनी व्यक्त केलेल्या इच्छेची दखल घेत शिवसेनेने मुर्मूंना पाठिंबा घेण्याचा निर्णय घेतल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.


शिवसेनेतील ४० आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेचे १८ पैकी १४ खासदारही एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची दाट शक्यता आहे. तर पुढील आठवड्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणुक होत आहे. शिवसेनेच्या खासदारांनी ठाकरे यांच्यावर मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी दबाव आणला होता. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदारांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याची मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि राजेंद्र गावित यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला ७ खासदार गैरहजर होते. या बैठकीत मुर्मू या महिला आहेत व आदिवासी समाजाच्या आहेत. मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांची तुलना करता मुर्मू यांनाच पाठिंबा देणे उचित ठरेल, असे स्पष्ट मत खासदारांनी व्यक्त केले. यामुळे राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतल्याचे राऊत यांनी सांगितले.


महाराष्ट्रात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी क्षेत्रात काम करणारे अधिक शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. बैठकी दरम्यान प्रत्येकाची मतं समजून घेतली. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला म्हणजे भाजपला पाठिंबा दिला असे नाही. यशवंत सिन्हा तेही विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांनाही आमच्या सद् भावना आहेत. कारण देशामध्ये एकी पाहिजे. हे जरी खर असले तरी अनेकदा अशा निवडणुकासंदर्भात एक लोक भावना काय आहेत. ते पाहून हा निर्णय घ्यावा लागतो, असे राऊत यांनी सांगितले.


यापूर्वीसुद्धा एनडीएत असून देखील शिवसेनेने प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. कारण प्रतिभा ताई पाटील पहिली महाराष्ट्राची मराठी महिला होत्या. त्यामुळे शिवसेनेला अशा प्रकारची निर्णय घेण्याची एक परंपरा असल्याचे राऊत यांनी सांगितले.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना