सर्वोच्च न्यायालयाकडून विजय मल्ल्याला ४ महिन्यांचा तुरुंगवास आणि २ हजारांचा दंड

नवी दिल्ली : भारतातील बँकांचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याला सर्वोच्च न्यायालयाने ४ महिन्यांचा तुरुंगवास आणि २ हजारांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती यू. यू. ललित यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींचे खंडपीठ हा निकाल दिला आहे.


सर्वोच्च न्यायालयाने १० मार्च रोजी निकाल राखून ठेवला होता. ९ मे २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने उद्योगपती विजय मल्ल्या याला न्यायालयाच्या अवमानप्रकरणी दोषी ठरवले होते. मल्ल्याने त्याच्या मालमत्तेची चुकीची माहिती दिली होती.


विजय मल्ल्याने डिएगो डीलमधून सुमारे ४० मिलियन डॉलर त्याच्या मुलांच्या खात्यात ट्रान्सफर केले होते. जे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन मानले गेले. यापूर्वी, न्यायालयाने आदेश दिले होते की, मल्ल्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचा पैशाचा व्यवहार करू शकत नाही, असे असतानाही मल्ल्याने हे पैसे आपल्या मुलांच्या खात्यात ट्रान्सफर केले. यानंतर डिएगो डीलमधून मिळालेली रक्कम सर्वोच्च न्यायालयात जमा करावी, अशी मागणी बँकांनी केली होती.


या प्रकरणी बँका आणि अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने १० जुलै २०१७ रोजी विजय मल्ल्याला सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने म्हटले होते की, मल्ल्या ब्रिटनमध्ये मुक्तपणे फिरत आहे. मात्र तो तेथे काय करतो, याबाबत कोणतीही माहिती समोर येत नाही.

Comments
Add Comment

Bengaluru News : क्रूरतेचा कळस! मोलकरणीनं लिफ्टमध्ये कुत्र्याच्या पिल्लाला आपटून संपवलं; मोलकरणीचं खोटं नाटक CCTV फूटेजमुळे उघड

बंगळुरु : कर्नाटकची राजधानी बंगळुरु (Bengaluru) येथील बागलूर (Bagaluru) मधील एका अपार्टमेंटमध्ये मुक्या जनावरासोबत अतिशय

Naxalite Surrender : 'सुनीता'चा माओवादी संघटनेला रामराम! १४ लाखांचे इनाम असलेली महिला नक्षलवादी अखेर शरण

बालाघाट : नक्षलग्रस्त भागातून एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बालाघाट

राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला, तर कंत्राटदाराला दंड; केंद्र सरकारचा निर्णय

निर्धारित कालावधीत एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास होणार कारवाई नवी दिल्ली  : रस्ते अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी,

'पप्पू, टप्पू आणि अप्पू' - महाआघाडी म्हणजे गांधीजींची तीन माकडं!

योगी आदित्यनाथ यांचा बिहारमधून राहुल, तेजस्वी, अखिलेशवर हल्लाबोल दरभंगा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या

राहुल गांधींनी केला छठी मैय्याचा अपमान; बिहारमध्ये प्रचंड बहुमताने एनडीए सरकार स्थापन होईल - अमित शाह

पाटणा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी शेओहर आणि सीतामढी जिल्ह्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)

Telangana Bus Accident : थरकाप उडवणारा अपघात! हायस्पीड लॉरी थेट बसमध्ये घुसली; किंचाळ्या आणि रक्ताचा सडा; २० हून अधिक लोकांचा दुर्दैवी अंत!

तेलंगणा : तेलंगणा राज्याच्या रंगारेड्डी (Rangareddy) जिल्ह्यातील चेवेल्ला मंडल (Chevella Mandal) येथे झालेल्या एका भीषण बस