अमरनाथ यात्रेला पुन्हा प्रारंभ, ४० भाविक अजूनही बेपत्ताच

जम्मू (हिं.स.) : गेल्या ८ जुलै रोजी झालेल्या ढगफुटीनंतर स्थगित करण्यात आलेल्या अमरनाथ यात्रेला सोमवारी पुन्हा सुरूवात झाली. जम्मू बेस कॅम्पमधून सकाळी भविकांचा गट पवित्र अमरनाथ गुफेच्या दर्शनासाठी रवाना झाला परंतु, ढगफुटीच्या घटनेत बेपत्ता झालेल्या ४० भाविकांचा अद्याप शोध लागलेला नाही.


अमरनाथ गुहेजवळ ८ जुलै रोजी ढगफुटी होऊन पूर आला होता. या दुर्घटनेत १६ रुग्णांचा मृत्यू झाला असून अद्यापही सुमारे ४० जण बेपत्ता आहेत. तर जखमी लोकांना एअरलिफ्ट करत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमींवर उपचार सुरु आहेत. या ठिकाणी अद्यापही बचावकार्य सुरुच असून रडार यंत्रणेद्वारे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. यासंदर्भात सैन्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सैन्याकडून ४ हजार रडार लावण्यात आले आहेत. यामुळे ढिगाऱ्याखाली अडकललेल्या लोकांचा शोध घेण्यात मदत होणार आहे.


दरम्यान ढगफुटीमुळे स्थगित करण्यात आलेली यात्रा सोमवारपासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. सोमवारी सकाळीच जम्मू येथील बेस कँम्पमधून यात्रेकरु अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. याआधी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी बेस कँम्पची पाहणी करत यात्रेकरुंसोबत संवाद साधला. यावेळी त्यावेळी यात्रेकरुंना योग्य सुविधा पुरवण्यात येतील असे आश्वासन दिले आहे.

Comments
Add Comment

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा