अमरनाथ यात्रेला पुन्हा प्रारंभ, ४० भाविक अजूनही बेपत्ताच

जम्मू (हिं.स.) : गेल्या ८ जुलै रोजी झालेल्या ढगफुटीनंतर स्थगित करण्यात आलेल्या अमरनाथ यात्रेला सोमवारी पुन्हा सुरूवात झाली. जम्मू बेस कॅम्पमधून सकाळी भविकांचा गट पवित्र अमरनाथ गुफेच्या दर्शनासाठी रवाना झाला परंतु, ढगफुटीच्या घटनेत बेपत्ता झालेल्या ४० भाविकांचा अद्याप शोध लागलेला नाही.


अमरनाथ गुहेजवळ ८ जुलै रोजी ढगफुटी होऊन पूर आला होता. या दुर्घटनेत १६ रुग्णांचा मृत्यू झाला असून अद्यापही सुमारे ४० जण बेपत्ता आहेत. तर जखमी लोकांना एअरलिफ्ट करत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमींवर उपचार सुरु आहेत. या ठिकाणी अद्यापही बचावकार्य सुरुच असून रडार यंत्रणेद्वारे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. यासंदर्भात सैन्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सैन्याकडून ४ हजार रडार लावण्यात आले आहेत. यामुळे ढिगाऱ्याखाली अडकललेल्या लोकांचा शोध घेण्यात मदत होणार आहे.


दरम्यान ढगफुटीमुळे स्थगित करण्यात आलेली यात्रा सोमवारपासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. सोमवारी सकाळीच जम्मू येथील बेस कँम्पमधून यात्रेकरु अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. याआधी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी बेस कँम्पची पाहणी करत यात्रेकरुंसोबत संवाद साधला. यावेळी त्यावेळी यात्रेकरुंना योग्य सुविधा पुरवण्यात येतील असे आश्वासन दिले आहे.

Comments
Add Comment

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान

- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी

Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त

ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे' नवे नियम लागू

नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर

EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली