ट्रकच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

भंडारा (हिं.स.) : भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर (खरबी) जवळील भारत पेट्रोलपंपजवळ उभ्या असलेल्या ट्रकला रायपूरकडून नागपूरच्या दिशेला जात असलेल्या भरधाव ट्रकने मागून धडक दिली. या भीषण अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर (खरबी) येथे घडली आहे.


हा ट्रक नागपूर कडे जात असताना मागून येत असलेल्या ट्रक ने मागील बाजूने धड़क दिली, ही धडक इतकी जोरदार होती कि ट्रक मधील लोहा कॅबिनला चिरत बाहेर निघाला, हा अपघातात क्लीनर रोहीत हिरालाल पटेल वय २२ वर्षे, मुरारी दिलीप सिंग वय २८ वर्षे, दोन्ही रा. गोपालगंज बिहार हे गंभीर जखमी होवून त्यांचा जागीच मृत्यु झाला व चालक शत्रोहन प्रभु प्रसाद वय ३० वर्षे रा. गोपालगंज बिहार यांचा नागपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाला.


या अपघातामुळे काही तास वाहतूक कोलमडली होती. नंतर दोन्ही ट्रकला क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आले व वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Comments
Add Comment

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह