आदित्य ठाकरेंनी मुंबईला भ्रष्टाचाराची गटारगंगा केली; नितेश राणे यांची टीका

  48

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी ठेकेदारांच्या फायद्यासाठी मुंबईला भ्रष्टाचाराची गटारगंगा केली, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत हा आरोप केला आहे.


ट्वीटमध्ये नितेश राणे म्हणाले की, “देशात आर्थिक विकासाची गंगा आणणाऱ्या आपल्या मुंबईला आदित्यसेनेने ठेकेदारांसाठी भ्रष्टाचाराची गटारगंगा केली आहे.” यासोबत नितेश राणे यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेली विधाने कशी फोल ठरली आहेत, याची तुलना केली आहे. मुंबईतील अनेक रस्त्यावर पाणी साचून नागरिकांना त्रास होत असलेले व्हिडीओमध्ये दिसत आहे.


व्हिडीओच्या माध्यमातून देखील त्यांनी आदित्य ठाकरेंवर टोलेबाजी केली आहे. “पहिल्याच पावसाने केली मनपाची पोलखोल, नालेसफाईच्या कामात झालाय झोल, टक्केवारीवीरांनी मुंबईकरांचे ५ हजार कोटी बुडवून दाखवले, कंत्राटदार आले पैशात न्हाऊन, मुंबईकर गेला पावसात वाहून, मुंबईची तुंबई करून दाखवली.” अशा शब्दांत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

Comments
Add Comment

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक

मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री