अग्निशमन दलाच्या जवांनानी वाचविले २० महिला कर्मचाऱ्यांचे प्राण

  86

सोनू शिंदे


उल्हासनगर : उल्हासनगर कँप १ येथील शहाडजवळ असलेल्या सेच्युरी रेयॉन कंपनीच्या समोरील एका दुकानात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानात अडकलेल्या तब्बल २० ते २५ महिला कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवण्यात कंपनीच्या सुरक्षा विभाग व अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. त्यांच्या तत्परतेमुळे या महिलांचे प्राण वाचल्याने त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


उल्हासनगर कँप १ येथील शहाडजवळ असलेल्या सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या लेबर गेट समोर रवि तलरेजा यांचे रॅम्बो पार्टी शॉप दुकानात शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. यामुळे दुकानात काम करणाऱ्या महिला कर्मचारी यांची एकच धावपळ सुरू झाली.


सेंच्युरी रेयॉन कंपनीचे (कर्नल) सुरेश शिंदे यांच्या ही बाब लक्षात येताच, त्यांनी लागलीच अग्निशमन दल व सुरक्षा विभागाचे सागर बेडेकर, अमित रासकर, कमलेश सिंग, बी.डी. घाडगे, दीपक पाटील, विजय चौगुले, राहुल सोनवणे, संतोष भोसले, कैलास चव्हाण, आर.एन. पाटील, एस. पनाडकर आदी अग्निशमन दलाचे व सुरक्षा विभागाच्या जवांनानी जिवाची पर्वा न करता सदर ठिकाणी जाऊन दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या तब्बल २० ते २५ महिला कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या