अग्निशमन दलाच्या जवांनानी वाचविले २० महिला कर्मचाऱ्यांचे प्राण

सोनू शिंदे


उल्हासनगर : उल्हासनगर कँप १ येथील शहाडजवळ असलेल्या सेच्युरी रेयॉन कंपनीच्या समोरील एका दुकानात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानात अडकलेल्या तब्बल २० ते २५ महिला कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवण्यात कंपनीच्या सुरक्षा विभाग व अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. त्यांच्या तत्परतेमुळे या महिलांचे प्राण वाचल्याने त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


उल्हासनगर कँप १ येथील शहाडजवळ असलेल्या सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या लेबर गेट समोर रवि तलरेजा यांचे रॅम्बो पार्टी शॉप दुकानात शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. यामुळे दुकानात काम करणाऱ्या महिला कर्मचारी यांची एकच धावपळ सुरू झाली.


सेंच्युरी रेयॉन कंपनीचे (कर्नल) सुरेश शिंदे यांच्या ही बाब लक्षात येताच, त्यांनी लागलीच अग्निशमन दल व सुरक्षा विभागाचे सागर बेडेकर, अमित रासकर, कमलेश सिंग, बी.डी. घाडगे, दीपक पाटील, विजय चौगुले, राहुल सोनवणे, संतोष भोसले, कैलास चव्हाण, आर.एन. पाटील, एस. पनाडकर आदी अग्निशमन दलाचे व सुरक्षा विभागाच्या जवांनानी जिवाची पर्वा न करता सदर ठिकाणी जाऊन दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या तब्बल २० ते २५ महिला कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले.

Comments
Add Comment

सात वर्षांच्या बांधकामांनंतर खड्डेमय ‘पलावा’चे उद्घाटन

७२ कोटींच्या खर्चानंतरही उड्डाणपुलाला ‘निसरडा भागा’ची उपमा मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील कल्याण-शीळ

कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरांचा धुमाकूळ

कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांची नोंद झाली आहे, ज्यात दोन प्रवाशांकडून एकूण

ठाणे जिल्हा परिषदेची 'डोअरस्टेप डिलिव्हरी' योजना आहे तरी काय?

ठाणे: ठाणे जिल्हा परिषदेने 'डोअरस्टेप डिलिव्हरी' (Doorstep Delivery) नावाची नवीन योजना सुरू केली आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील

Navratri 2025 : नवरात्री मंडपामुळे ठाण्यात 'या' भागात वाहतूक कोंडी

ठाणे: नवरात्री सणाच्या तयारीमुळे ठाण्यातील टेंभीनाका चौकात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते. आजपासून येथे

कल्याणमधील रामदेव हॉटेलचा हलगर्जीपणा, फ्राईड राईसमध्ये आढळले झुरळ!

कल्याण: कल्याणमधील रामदेव या नामांकित शाकाहारी हॉटेलसंबंधित एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हॉटेलच्या

पतीकडून पत्नीची हत्या, शरीराचे केले १७ तुकडे

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एका नराधम पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे १७ तुकडे