अलिबाग, मुरुड तालुक्यातील आठ पूल धोकादायक स्थितीत

अलिबाग (वार्ताहर) : अलिबागसह मुरुड तालुक्यातील आठ पूल धोकादायक झाले आहेत. यातील खडताळ आणि सहाण बायपास येथील पाले पूल नव्याने बांधण्यात येणार असल्याची माहिती अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


खडताळ पुलासाठी १० कोटी, तर पालेसाठी साडेसात कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. रेवदंडासह अन्य पुलांचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे. अलिबाग, मुरुड तालुक्यात ४४ लहान २५ मोठे असे एकूण ६९ पूल आहेत. यापैकी १३ पुलाचे स्ट्रक्चकल ऑडिट करण्यात आले असून, पैकी आठ पूल धोकादायक असल्याचे दिसून आले आहेत.


या पुलांच्या पुनर्बांधणीसाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आले असून, रेवदंडा पुलासाठी, खडताळ पुलासाठी दहा कोटी, एकदरा पाच कोटी, सहाण पाले साडेसात कोटी, आवास अडीच कोटी, तर सासवणे पुलासाठी ८० लाख पुनर्बांधणी कामासाठी खर्च होणार आहेत. रेवदंडा, एकदरा पुलाच्या कामासाठी निविदा काढण्यात आली आहे, तर उर्वरित पुलांसाठी प्रक्रिया सुरू असून, धोकादायक पुलावरून अवजड वाहने नेण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. अलिबागजवळील खडताळ पूल हा ब्रिटिशकालीन असून, दोनशे वर्षे पुरातन आहे. रेवदंडा पूल हा १९८४ साली बांधलेला असून, त्याला ३८ वर्षे झाली आहेत. इतर पूलही चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी बांधलेले असून त्यांचे बांधकाम जीर्ण झालेले आहे.


पुलाचे प्रस्ताव मंजूर झालेले असून, बजेटमध्ये निधीची तरतूदही करण्यात आलेली आहे. निविदा प्रक्रिया करण्यात आलेली असून, लवकरच पुलांची कामे सुरू होणार असल्याचे सुखदवे यांनी सांगितले. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीच्या अानुषंगाने बांधकाम विभागही सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग