अलिबाग, मुरुड तालुक्यातील आठ पूल धोकादायक स्थितीत

अलिबाग (वार्ताहर) : अलिबागसह मुरुड तालुक्यातील आठ पूल धोकादायक झाले आहेत. यातील खडताळ आणि सहाण बायपास येथील पाले पूल नव्याने बांधण्यात येणार असल्याची माहिती अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


खडताळ पुलासाठी १० कोटी, तर पालेसाठी साडेसात कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. रेवदंडासह अन्य पुलांचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे. अलिबाग, मुरुड तालुक्यात ४४ लहान २५ मोठे असे एकूण ६९ पूल आहेत. यापैकी १३ पुलाचे स्ट्रक्चकल ऑडिट करण्यात आले असून, पैकी आठ पूल धोकादायक असल्याचे दिसून आले आहेत.


या पुलांच्या पुनर्बांधणीसाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आले असून, रेवदंडा पुलासाठी, खडताळ पुलासाठी दहा कोटी, एकदरा पाच कोटी, सहाण पाले साडेसात कोटी, आवास अडीच कोटी, तर सासवणे पुलासाठी ८० लाख पुनर्बांधणी कामासाठी खर्च होणार आहेत. रेवदंडा, एकदरा पुलाच्या कामासाठी निविदा काढण्यात आली आहे, तर उर्वरित पुलांसाठी प्रक्रिया सुरू असून, धोकादायक पुलावरून अवजड वाहने नेण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. अलिबागजवळील खडताळ पूल हा ब्रिटिशकालीन असून, दोनशे वर्षे पुरातन आहे. रेवदंडा पूल हा १९८४ साली बांधलेला असून, त्याला ३८ वर्षे झाली आहेत. इतर पूलही चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी बांधलेले असून त्यांचे बांधकाम जीर्ण झालेले आहे.


पुलाचे प्रस्ताव मंजूर झालेले असून, बजेटमध्ये निधीची तरतूदही करण्यात आलेली आहे. निविदा प्रक्रिया करण्यात आलेली असून, लवकरच पुलांची कामे सुरू होणार असल्याचे सुखदवे यांनी सांगितले. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीच्या अानुषंगाने बांधकाम विभागही सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Comments
Add Comment

पेण अर्बन बँकेच्या संचालकांकडून प्रत्येकी २४ कोटींची वसुली?

बँक घोटाळ्यात सहकार आयुक्तांनी निश्चित केली सामूहिक जबाबदारी सुभाष म्हात्रे अलिबाग : पेण अर्बन बँक घोटाळ्यातील

अलिबाग नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

उबाठा गटाचे स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे संकेत अलिबाग : अलिबाग नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची घोषणा

महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप युती

राष्ट्रवादी काँग्रेसला नगराध्यक्ष पद आणि १५ जागा महाड : ऐतिहासिक महाड नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

जंजिरा किल्ला तब्बल नऊ दिवसांनी पर्यटकांसाठी झाला खुला

मुरुड : मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची मांदियाळी येत असते. अचानक हवामानात बदल

करंजाचा धाडसी युवक आतिश कोळी ठरला ‘देवदूत’

वादळात अडकलेल्या १५ खलाशांचा वाचवला जीव अलिबाग  : उरण तालुक्यातील करंजा पाडा येथील आतिश सदानंद कोळी या युवकाने