Categories: रायगड

अलिबाग, मुरुड तालुक्यातील आठ पूल धोकादायक स्थितीत

Share

अलिबाग (वार्ताहर) : अलिबागसह मुरुड तालुक्यातील आठ पूल धोकादायक झाले आहेत. यातील खडताळ आणि सहाण बायपास येथील पाले पूल नव्याने बांधण्यात येणार असल्याची माहिती अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खडताळ पुलासाठी १० कोटी, तर पालेसाठी साडेसात कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. रेवदंडासह अन्य पुलांचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे. अलिबाग, मुरुड तालुक्यात ४४ लहान २५ मोठे असे एकूण ६९ पूल आहेत. यापैकी १३ पुलाचे स्ट्रक्चकल ऑडिट करण्यात आले असून, पैकी आठ पूल धोकादायक असल्याचे दिसून आले आहेत.

या पुलांच्या पुनर्बांधणीसाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आले असून, रेवदंडा पुलासाठी, खडताळ पुलासाठी दहा कोटी, एकदरा पाच कोटी, सहाण पाले साडेसात कोटी, आवास अडीच कोटी, तर सासवणे पुलासाठी ८० लाख पुनर्बांधणी कामासाठी खर्च होणार आहेत. रेवदंडा, एकदरा पुलाच्या कामासाठी निविदा काढण्यात आली आहे, तर उर्वरित पुलांसाठी प्रक्रिया सुरू असून, धोकादायक पुलावरून अवजड वाहने नेण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. अलिबागजवळील खडताळ पूल हा ब्रिटिशकालीन असून, दोनशे वर्षे पुरातन आहे. रेवदंडा पूल हा १९८४ साली बांधलेला असून, त्याला ३८ वर्षे झाली आहेत. इतर पूलही चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी बांधलेले असून त्यांचे बांधकाम जीर्ण झालेले आहे.

पुलाचे प्रस्ताव मंजूर झालेले असून, बजेटमध्ये निधीची तरतूदही करण्यात आलेली आहे. निविदा प्रक्रिया करण्यात आलेली असून, लवकरच पुलांची कामे सुरू होणार असल्याचे सुखदवे यांनी सांगितले. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीच्या अानुषंगाने बांधकाम विभागही सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Recent Posts

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

3 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

23 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

55 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

1 hour ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago