अमरनाथ : अमरनाथ गुहेजवळ झालेल्या ढगफुटीत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. या ढगफुटीत आळंदी येथील एका महिला भाविकाचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल ५० जण बेपत्ता आहेत.
या दुर्घटनेवेळी आळंदी येथील काही भाविकही तिथे होते. आळंदीतील अजय सोनुने महाराज आळंदी परिसरातील ५० भाविकांना घेऊन अमरनाथला गेले होते. शुक्रवारी दर्शन करून परत येत असताना अचानक ढगफुटी झाली.
यात या महिलेचा मृत्यू झाला. उर्वरित सगळे भाविक सुखरूप असून बेस कॅम्पकडे परतत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. इतर पर्यटक संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.
जेव्हा ढगफुटी झाली तेव्हा गुहेजवळच तब्बल १० ते १५ हजार भाविक हजर असल्याचे सांगितले जात आहे. ढगफुटीचे वृत्त कळताच तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. मात्र दुर्दैवाने तोपर्यंत मोठ्या संख्येने भाविक वाहून गेले होते. ढगफुटीची घटना पवित्र गुहेजवळील एक ते दोन किमीच्या अंतरावर घडली. हिमालय रांगातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे भाविकांसाठी लावलेले २५ टेंट आणि दोन लंगर पाण्यात वाहून गेले. पावसामुळे या संपूर्ण भागात पाणी जमा झाले आहे.
घटनास्थळावरून आतापर्यंत १६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचावकार्य अजूनही सुरू आहे. ४० जण अजूनही बेपत्ता असून ६४ जण जखमी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…