अमरावतीत जामडोल येथे वीज पडून दोघांचा मृत्यू

अमरावती (हिं.स.) : अमरावती तालुक्यातील माहूली जहागीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जामडोल शेतशिवारात आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक मेघ गर्जनेसह पाऊस पडला, यात शेतात काम करत असलेल्या ६ जणांच्या अंगावर वीज पडली, यात दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर यात चार जण सुखरूप बचावले. मृतकांमध्ये किशोर भगवान पाटील आणि अविनाश श्यामराव निबोंरकर यांचा समावेश आहे.


प्राप्त माहितीनुसार शेतात फवारणी करण्यासाठी गेले असता सदर प्रकार घडला, मृतक शेतकरी किशोर पाटील हे जामडोल येथे बऱ्याच वर्षा पासून शेती मक्ताने वाहीत होते, नेहमी प्रमाणे ते आपल्या शेतात मजूर घेऊन गेले होते, पाऊस आल्याने झाडाच्या आडोशाला सर्व सहाही जण थांबले असता त्यांच्या अंगावर वीज कोसळली यात ही घटना घडली, तर यात एक जण किरकोळ जखमी सुध्दा झाला, घटनास्थळी माहूली जहागीर पोलीस व महसूल कर्मचारी दाखल झाले होते.

Comments
Add Comment

Sheetal Tejwani Arrested : पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यात मोठी कारवाई; प्रमुख आरोपी शीतल तेजवानीला अखेर अटक!

पुणे : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत या प्रकरणातील प्रमुख

Sadanand Date : सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक? महाराष्ट्र सरकारने पाठवला केंद्राकडे प्रस्ताव

मुंबई : राज्याच्या विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून,

Devendra Fadanvis : 'राजकीय पर्यावरणवाद्यां'कडून कुंभमेळ्याच्या आयोजनात खोडा घालण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांचा थेट आरोप!

पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता भव्यदिव्य आयोजन करणार मुंबई : “नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयोजनात अडथळे

Assembly Winter Session 2025 : नागपूर हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित! किती दिवस चालणार अधिवेशन?

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले नागपूर (Nagpur) येथील हिवाळी अधिवेशन (Winter Session) अखेर किती दिवस चालणार,

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर; 'या' संकेतस्थळावर जाणून घ्या अधिक माहिती

पुणे: शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन

आधी उड्डाणपूल अन् आता मेट्रो, सिंहगड रस्त्यावर पुणेकरांचा पुन्हा होणार खोळंबा!

पुणे: सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने काही महिन्यांपूर्वी ११८ कोटी रुपये खर्च करून