पुराच्या पाण्यात अडकलेल्या स्कूलबसमधील ३० बालकांची सुखरूप सुटका

मेहबूबनगर (हिं.स.) : तेलंगणातील मेहबूबनगर जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस पुराच्या पाण्यात अडकल्याची घटना शुक्रवारी घडली. मचनपल्ली आणि सिगुर गड्डा तांडा दरम्यान पुराच्या पाण्यात अडकलेल्या या बसमधील सर्व ३० मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली. हा सर्व प्रकार सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडला.


यासंदर्भातील मेहबूबनगरच्या पोलिस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार मेहबूबनगर शहरातील भश्याम शाळेची बस रामचंद्रपूरम, मचनपल्ली, सुगुरगद्दाफी तांडा येथून मुलांना घेऊन भश्याम टेक्नॉलॉजी स्कूलच्या दिशेने निघाली होती. मचनपल्ली आणि सिगुर गड्डा तांडा दरम्यानच्या रेल्वेच्या अंडरब्रिजमध्ये बुडाली. पाणी इतके खोल असेल आणि त्यात बस अडकेल, याची चालकाला कल्पना आली नाही. चालकाने बस पुढे नेली आणि ती पुराच्या पाण्यात अडकली आणि हळूहळू बुडू लागली. यानंतर तिथे उपस्थित लोकांनी तत्परता दाखवून मदतीचा हात पुढे केला. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यामध्ये लोक शाळकरी मुलांना बसमधून बाहेर काढताना दिसत आहेत. तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने बस बाहेर काढण्यात आली.


महबूबनगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यभर मान्सून सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरु आहे. जगतियाल, राजन्ना सिरसिल्ला, करीमनगर, पेड्डापल्ली, वारंगल (ग्रामीण), आणि वारंगल (शहरी) यासह काही जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच रंगारेड्डी, मेडचल-मलकाजगिरी, यदाद्री-भोंगीर, कामरेड्डी, जानगाव, राजन्ना सिरसिल्ला आणि जगतियाल यासह इतर अनेक जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस झाला. निजामाबाद जिल्ह्यातील मेंदोरा येथे ५ जुलै रोजी सर्वाधिक १०८.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

Comments
Add Comment

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

Delhi Crime : धक्कादायक! चालत्या गाडीत विवाहित प्रेयसीची क्रूर हत्या; थेट शीर कापले, मृतदेह नाल्यात फेकला अन्...

दिल्ली : नोएडामध्ये घडलेल्या एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण परिसर तसेच पोलीस प्रशासनाला हादरवून सोडले आहे.

PM Kisan Yojana : बिहारमध्ये 'विजयाच्या त्सुनामी'नंतर PM मोदींचं मोठं गिफ्ट! ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'या' दिवशी जमा होणार पैसे

बिहार : बिहार निवडणुकीत एनडीएच्या भव्य विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर

Nowgam Police Station Blast : चार दिवसांत देशाला दुहेरी धक्का! श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशन स्फोटाचे नेमकं कारण काय?

श्रीनगर : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी, १० नोव्हेंबर रोजी i-२० कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १२ जणांचा

बिहारमध्ये भाजप अव्वल, महाराष्ट्रासह १३ राज्यांवर भाजपची सत्ता! जाणून घ्या सविस्तर...

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर आघाडी घेतल्याने एनडीएचा दणदणीत विजय झाला.