अमरावती जिल्ह्यात सहा महिन्यांत ५४८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

  80

अमरावती (हिं.स.) : कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने त्रस्त झालेल्या तब्बल ५४८ शेतकऱ्यांनी मागील सहा महिन्यांत मृत्यूला कवटाळले आहे. यंदा दर आठ तासांत एक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे दाहक वास्तव आहे.


शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी शासनाने अनेक योजना दिल्या. जागतिक बँकेच्या सहकार्यानेही काही प्रकल्प राबविले. यामध्ये खऱ्या व गरजू शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेलाच नाही, कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार घडल्याने या सर्व योजना आत्महत्या रोखण्यात कुचकामी ठरल्या आहेत.


विभागीय आयुक्त कार्यालयाचे अहवालानुसार यंदा जानेवारी महिन्यात ९५, फेब्रुवारीत १११, मार्च महिन्यात १००, मेमध्ये ८० व जून महिन्यात ६२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत. यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्यांचे वाढते सत्र वाढल्याने चिंतेत भर पडली आहे.


सन २००१ पासून १८,२०८ आत्महत्या


शेतकरी आत्महत्याग्रस्त ११ जिल्ह्यांमध्ये १ जानेवारी २००१ पासून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. या कालावधीत पश्चिम विदर्भात ३० जून २०२२ पर्यंत १८,२०८ शेतकरी आत्महत्यांची नोंद झालेली आहे. यापैकी अर्धेअधिक म्हणजेच ९,६४३ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली तर ८,२९६ प्रकरणांमध्ये शासन मदत देण्यात आली. अद्याप २६९ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

Comments
Add Comment

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे