पावसाळ्यातही एसी लोकलला प्रवाशांची पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सुरुवातीला एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या अल्प होती, पण रेल्वे प्रशासनाने तिकीट दरात कपातीचा निर्णय घेतल्यानंतर एसी लोकलच्या तिकीट आणि पास विक्रीत वाढ होऊ लागली आहे. पावसाने जोर धरला असतानाही जून महिन्यात एसी लोकलने प्रवाशांनी सर्वाधिक प्रवास केला आहे.


प्रवासी वर्गाचे असे मत आहे की, एसी लोकलमधून प्रवास करताना पावसापासून संरक्षण मिळते. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील एकूण तिकीट विक्री दोन लाखांपार गेली असून मध्य रेल्वेवर जूनमध्ये एकूण २ लाख ९ हजार ३९५ आणि पश्चिम रेल्वेवर दोन लाख ३८ हजार २७४ तिकीटांची विक्री झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार मार्गावर वातानुकूलित लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. सुरुवातीपासून या सेवांना अल्प प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे तिकीट दरात कपात करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत होती.


अखेर ५ मेपासून तिकीट दरात ५० टक्के कपात करण्यात आली. वाढलेला उकाडा आणि तिकीट दरातील कपात यामुळे मे महिन्यात या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. मध्य रेल्वेवर मे मध्ये एकूण १ लाख ८४ हजार ७९९ तिकीटांची विक्री झाली, तर पश्चिम रेल्वेवर १ लाख ९६ हजार ९३८ तिकीटे विकली गेली. मध्य रेल्वेवर जूनमध्ये एकूण २ लाख ९ हजार ३९६, तर पश्चिम रेल्वेवर २ लाख ३८ हजार २७४ तिकिटांची विक्री झाली आहे.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत