एलएएच आयएनएस ३२४ भारतीय नौदलात रुजू

विशाखापट्टणम (हिं.स) : आयएनएस देगा, विशाखापट्टणम येथे आयोजित एका समारंभात पूर्व नौदल कमांडचे ध्वज अधिकारी कमांडिंग-इन-चीफ, एव्हीएसएम, वायएसएम, व्हीएसएम व्हाइस ॲडमिरल बिस्वजित दासगुप्ता यांच्या उपस्थितीत, आयएनएएस ३२४ विमान भारतीय नौदलात दाखल झाले. स्वदेशी रचना असलेले आणि एमके III (एममार) प्रगत हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टरचे (एएलएच) परिचालन करणारे हे पूर्व किनाऱ्यावर तैनात पहिले पथक आहे.


एएलएच एमके III या हेलिकॉप्टरमध्ये अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात आली आहेत ज्यात देखरेख ठेवणारे आधुनिक रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल सेन्सर यांचा समावेश आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) ही वजनाने हलकी हेलिकॉप्टर्स विकसित केली असून त्यांची निर्मितीही केली आहे. त्यामुळे भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या अनुषंगाने, या हेलिकॉप्टर्सचा समावेश करण्यात आला आहे. एमआर आणि एसएआर हे हेलिकॉप्टर त्यांच्या मुख्य भूमिकांव्यतिरिक्त, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण मोहिमा तसेच मरीन कमांडोसह विशेष मोहिमांसाठी देखील तैनात केले जाऊ शकतात.


हेलिकॉप्टरमध्ये गंभीर आजारी रूग्णांच्या वैद्यकीय स्थलांतराची सोय करण्यासाठी एअर ॲम्ब्युलन्सच्या रूपात वापरण्यासाठी एअरबोर्न मेडिकल इंटेन्सिव्ह केअर युनिट (एमआयसीयु) देखील आहे. पूर्व नौदल कमांडमध्ये पहिल्या एएलएच एमके III तुकडीची नियुक्ती केल्याने पूर्व किनाऱ्यावर देखरेख ठेवण्याची क्षमता वाढेल, असे या कार्यक्रमाला संबोधित करताना, व्हाईस ॲडमिरल बिस्वजित दासगुप्ता यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला