मुंबईसह रत्नागिरी आणि कोल्हापूरात मुसळधार

मुंबई : राज्यात कोकणासह अनेक भागात जोरदार बॅटींग सुरू आहे. तर दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मात्र अद्यापही पाऊस झालेला नाही.


मुंबईसह रत्नागिरी आणि कोल्हापूरला पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. कोकणात मुसळधार पाऊस असल्याने रत्नागिरीत पूरस्थिती असून कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला उपाययोजनांच्या सूचना दिल्या आहेत.



राजाराम बंधारा, बर्की बंधारा पाण्याखाली, पर्यटक अडकले


कोल्हापुरात सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. सकाळपर्यंत राधानगरी धरणातील पाणीसाठा वाढत आहे. भोगावती आणि कासारी नदी दुथडी भरून वाहत आहे. बर्की बंधारा पाण्याखाली गेला असून येथील धबधबा पाहण्यासाठी आलेले पर्यटक गावातच अडकले आहेत. पाणी कमी होईपर्यंत पर्यटकांना वाट पहावी लागणार आहे.


८० पर्यटक सुखरूप


कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील बर्की धबधबा पाहण्यासाठी सोमवारी दुपारी २ वाजता कोल्हापूर येथून २ मिनीबस व ८ कारमधून अंदाजे ८० पर्यटक गेले होते. परतीच्या प्रवासावेळी सायंकाळी ५ वाजता बर्की गावाजवळील ताफेरा ओढा तसेच कासारी नदीवरील पुलावर पाणी आल्याने सर्व प्रवासी अडकले होते. दोन्ही ठिकाणची पाणी पातळी ओसरल्यावर सर्व वाहने व प्रवासी सुखरूप बाहेर पडले आहेत. या प्रवाशांना धीर देण्यासाठी व त्यांच्या सोयीसाठी बर्की ग्रामस्थ, तरुण मंडळाचे अध्यक्ष, गावकरी, रेशन दुकानदार व वनरक्षक त्यांच्या सोबत होते.


गोवा महामार्गावर तीन ठिकाणी दरड कोसळली


गोवा महामार्गावरील परशुराम घाटात तीन ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. चौपदीकरणासाठी घाटाचे काम सुरु आहे. मात्र दरड कोसळल्याने घाटातील बांधकामावरही मोठा परिणाम झाला आहे.

Comments
Add Comment

प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये ५१ टक्के मतांचा संकल्प करा - बावनकुळे

नागपूर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक सर्कल मध्ये ५१ टक्के मते मिळतील असा संकल्प करा, असे आवाहन

मुंबईसह विविध ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

ठाणे : मुंबईतील वाकोला प्रभाग क्रमांक ९१ चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक सगुण नाईक त्यांची कन्या युवासेना कॉलेज कक्ष

पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू, अपघाताने २३ वाघांचा मृत्यू

चंद्रपूर : मागील पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात नैसर्गिक मृत्यू असले तरी,

शनिवार वाड्यावर नमाज पठण, निषेधासाठी भाजपच्या नेतृत्वात हिंदुत्ववाद्यांचे आंदोलन

पुणे : शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून

शनिवार वाड्यात नमाज पठण? ऐन दिवाळीत पुण्यात वादाची ठिणगी !

पुणे : पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार

तोच फोटो ठरला शेवटची आठवण, एकाचवेळी झाला सात मित्रांचा मृत्यू

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील अस्तंबा अर्थात अश्वस्थामा यात्रेतून परतणाऱ्या यात्रेकरूंना