पूराचा सामना करण्यासाठी रेल्वेच्या ताफ्यात ५ बोटी

मुंबई (प्रतिनिधी) : मुसळधार पावसाने काही वर्षांपूर्वी बदलापूर वांगणी दरम्यान गोरेगाव जवळ महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती. गाडीच्या दोन्ही बाजूला महापूर सदृश्य परीस्थिती निर्माण होत शेकडो प्रवासी रात्रभर या एक्स्प्रेसमध्ये अडकून पडले होते. यावेळी एन.डी.आर.एफ आणि रेल्वे सुरक्षा दलाने घटनास्थळी दाखल होत अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी हेलिकॉप्टर आणि सुरक्षा बोटींचा वापर सर्वाधिक करण्यात आला.


या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने सुरक्षा बोटीत वाढ करण्याचा निर्णय घेत उपनगरीय रेल्वे मार्गावरील पूर परिस्थिती अथवा इतर सागरी संकटांचा सामना करण्यासाठी ५ बोटी आपल्या ताफ्यात तैनात केल्या आहेत. सध्या सुरू असणारा मुसळधार पाऊस पाहता रेल्वे सुरक्षा दलाने आपली विशेष पथके ठिकठिकाणी तैनात केली असून प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.


सुरुवातीला २ बोटी रेल्वे सुरक्षा दलाकडे होत्या. परंतु २०१९ मध्ये बदलापूर वांगणी येथे पूरसदृश्य परीस्थिती निर्माण होत महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात अडकून पडल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर मान्सूनपूर्व कामे आणि रेल्वे सुरक्षा दलाला पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध समस्यांसाठी मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आल्या. यामध्ये विशेष पथके, सुरक्षा बोटींमध्ये वाढ, पूर्वपरीस्थितीचा सामना करण्यासाठी विशेष शिबिरे आणि प्रशिक्षण देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन