पूराचा सामना करण्यासाठी रेल्वेच्या ताफ्यात ५ बोटी

  118

मुंबई (प्रतिनिधी) : मुसळधार पावसाने काही वर्षांपूर्वी बदलापूर वांगणी दरम्यान गोरेगाव जवळ महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती. गाडीच्या दोन्ही बाजूला महापूर सदृश्य परीस्थिती निर्माण होत शेकडो प्रवासी रात्रभर या एक्स्प्रेसमध्ये अडकून पडले होते. यावेळी एन.डी.आर.एफ आणि रेल्वे सुरक्षा दलाने घटनास्थळी दाखल होत अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी हेलिकॉप्टर आणि सुरक्षा बोटींचा वापर सर्वाधिक करण्यात आला.


या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने सुरक्षा बोटीत वाढ करण्याचा निर्णय घेत उपनगरीय रेल्वे मार्गावरील पूर परिस्थिती अथवा इतर सागरी संकटांचा सामना करण्यासाठी ५ बोटी आपल्या ताफ्यात तैनात केल्या आहेत. सध्या सुरू असणारा मुसळधार पाऊस पाहता रेल्वे सुरक्षा दलाने आपली विशेष पथके ठिकठिकाणी तैनात केली असून प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.


सुरुवातीला २ बोटी रेल्वे सुरक्षा दलाकडे होत्या. परंतु २०१९ मध्ये बदलापूर वांगणी येथे पूरसदृश्य परीस्थिती निर्माण होत महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात अडकून पडल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर मान्सूनपूर्व कामे आणि रेल्वे सुरक्षा दलाला पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध समस्यांसाठी मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आल्या. यामध्ये विशेष पथके, सुरक्षा बोटींमध्ये वाढ, पूर्वपरीस्थितीचा सामना करण्यासाठी विशेष शिबिरे आणि प्रशिक्षण देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत

Mumbai Building Collapse: मदनपुरात चार मजली इमारत कोसळली, परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या गजबलेल्या परिसरात येत असलेली एक जुनी इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मदनपुरा

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी