पूराचा सामना करण्यासाठी रेल्वेच्या ताफ्यात ५ बोटी

  122

मुंबई (प्रतिनिधी) : मुसळधार पावसाने काही वर्षांपूर्वी बदलापूर वांगणी दरम्यान गोरेगाव जवळ महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती. गाडीच्या दोन्ही बाजूला महापूर सदृश्य परीस्थिती निर्माण होत शेकडो प्रवासी रात्रभर या एक्स्प्रेसमध्ये अडकून पडले होते. यावेळी एन.डी.आर.एफ आणि रेल्वे सुरक्षा दलाने घटनास्थळी दाखल होत अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी हेलिकॉप्टर आणि सुरक्षा बोटींचा वापर सर्वाधिक करण्यात आला.


या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने सुरक्षा बोटीत वाढ करण्याचा निर्णय घेत उपनगरीय रेल्वे मार्गावरील पूर परिस्थिती अथवा इतर सागरी संकटांचा सामना करण्यासाठी ५ बोटी आपल्या ताफ्यात तैनात केल्या आहेत. सध्या सुरू असणारा मुसळधार पाऊस पाहता रेल्वे सुरक्षा दलाने आपली विशेष पथके ठिकठिकाणी तैनात केली असून प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.


सुरुवातीला २ बोटी रेल्वे सुरक्षा दलाकडे होत्या. परंतु २०१९ मध्ये बदलापूर वांगणी येथे पूरसदृश्य परीस्थिती निर्माण होत महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात अडकून पडल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर मान्सूनपूर्व कामे आणि रेल्वे सुरक्षा दलाला पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध समस्यांसाठी मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आल्या. यामध्ये विशेष पथके, सुरक्षा बोटींमध्ये वाढ, पूर्वपरीस्थितीचा सामना करण्यासाठी विशेष शिबिरे आणि प्रशिक्षण देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही