सेवामुक्तीनंतरही अग्निवीरांना मिळणार निःशुल्क उपचार

नवी दिल्ली (हिं.स.) : केंद्र सरकारने या अग्नीवीरांसाठी आणखी एक सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार सेवाकाळात जखमी झालेल्या अग्नीवीरांना २३ व्या वर्षानंतर सैन्यदलांतून सेवामुक्त झाल्यावरही मोफत उपचार करण्याचा प्रस्ताव जाहीर करण्यात आला आहे.


योजनेला झालेला हा विरोध पहाता केंद्र सरकारने टप्प्याटप्प्याने दिलासा देणाऱ्या घोषणा सुरू केल्या आहे. निमलष्करी दलांमध्ये, राज्यांच्या पोलिस दलांमध्ये ७५ टक्के सेवामुक्त अग्नीवीरांना राखीव जागा ठेवण्याच्या घोषणा टप्प्याटप्याने करण्यात आल्या आहेत.


याच दरम्यान हवाई दलाने त्यांच्या कोट्यातील ३ हजार अग्नीवीरांची ऑनलाईन भरती मोहीम सुरू केली. पहिल्या केवळ ६ दिवसांत हवाई दलाकडे तब्बल २ लाखांहून जास्त तरूणांनी अर्ज केले. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाकडून अग्नीवीरांसाठी एका नवीन सवलतीची घोषणा आज करण्यात आली.


त्यानुसार सेवाकाळात जखमी झालेल्या व दीर्घ उपचारांची गरज असलेल्या अग्नीवीरांना सेवामुक्त केल्यावरही मोफत उपचारांची सुविधा कायम ठेवण्यात येणार आहे. योग्यता व कामगिरीच्या आधारावर लष्करी सेवेतून ४ वर्षांनी मुक्त केले जाणा-या ७५ टक्के तरूणांना जे ११.७१ लाख रूपयांचे सेवा निधी पॅकेज मिळणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे मोफत उपचार असतील असेही स्पष्ट करण्यात आले.


संबंधित अग्नीवीर गंभीर जखमी झाले असतील व त्यांना दीर्घ उपचारांची गरज असेल त्यांच्यावर त्या कालावधीत लष्कराच्या नियमांनुसार सैन्यदलांच्या रूग्णालयांत उपचार करण्यात येतील. सेवाकाळात गंभीर जखमीझाल्यास १५ लाखांपासून ४४ लाखांपर्यंत भरपाई देण्याची तरतूद मूळ योजनेत यापूर्वीच करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

धीरेंद्र शास्त्री करणार भुतांवर पीएचडी ; भुतांवर उच्च शिक्षणाची दारे खुली ?

बागेश्वर धाम : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त करत

'वन्यजीव संरक्षण अधिनियमात सुधारणा करा'

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांत बिबट्यांनी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही धुमाकूळ घातला आहे.

संसदेत ई-सिगारेट वादाने खळबळ; अनुराग ठाकूर यांच्या आरोपांवर टीएमसीची जोरदार प्रतिक्रिया

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत ई सिगारेट या एका मुद्द्यावरून गदारोळ निर्माण

ऐतिहासिक सन्मान! युनेस्कोच्या वारसा यादीत 'दिवाळी'चा समावेश

नवी दिल्ली : भारताची गौरवशाली आणि निरंतर चालत आलेली परंपरा असलेल्या दीपावली सणाला अखेर जागतिक स्तरावर ऐतिहासिक

नेहरू-गांधी कुटुंबांकडून तीन वेळा मतचोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप फक्त दोन मते िमळूनही नेहरू झाले पंतप्रधान ! नवी दिल्ली : नेहरू-गांधी

गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे