अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा कट उधळला, दोन दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली (हिं.स.) : दोन वर्षांच्या कालखंडानंतर अमरनाथ यात्रा यावर्षी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या यात्रेवर दहशतवादी हल्ला होण्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार जम्मू काश्मीरमधील तुकसानमध्ये 'लष्कर ए तोयबा'च्या फैजल अहमद डार आणि तालिब हुसेन या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या दोघांच्या अटकेमुळे दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळण्यात आला असून सुरक्षा यंत्रणांसाठी हे मोठे यश आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी फैजल हा लष्कर ए तोयबाचा पहिल्या फळीतील दहशतवादी आहे. दोघांकडून दोन एके-४७ (AK-47) रायफल, ७ ग्रेनेड आणि एक पिस्टल जप्त करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांना पकडून देणाऱ्यांना ग्रामीण पोलिसांनी दोन लाख, तर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी ५ लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. अधिक चौकशीत पोलिसांना अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याची या दहशतवाद्यांची योजना असल्याची माहिती समोर आली.


जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हा हल्ला होणार होता. पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये तालिब हुसेनचा या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. तालिबने यापूर्वी राजौरीमध्ये दोन बॉम्बस्फोटाची चाचणी घेतली होती. त्याने फैजलशी संपर्क साधला होता. त्यानंतर हे दोघे तुकसान जिल्ह्यातील गावात लपून बसले होते. त्यांनी पुढील हालचाल करण्यापूर्वीच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना अटक केली.

Comments
Add Comment

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा