अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा कट उधळला, दोन दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली (हिं.स.) : दोन वर्षांच्या कालखंडानंतर अमरनाथ यात्रा यावर्षी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या यात्रेवर दहशतवादी हल्ला होण्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार जम्मू काश्मीरमधील तुकसानमध्ये 'लष्कर ए तोयबा'च्या फैजल अहमद डार आणि तालिब हुसेन या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या दोघांच्या अटकेमुळे दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळण्यात आला असून सुरक्षा यंत्रणांसाठी हे मोठे यश आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी फैजल हा लष्कर ए तोयबाचा पहिल्या फळीतील दहशतवादी आहे. दोघांकडून दोन एके-४७ (AK-47) रायफल, ७ ग्रेनेड आणि एक पिस्टल जप्त करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांना पकडून देणाऱ्यांना ग्रामीण पोलिसांनी दोन लाख, तर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी ५ लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. अधिक चौकशीत पोलिसांना अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याची या दहशतवाद्यांची योजना असल्याची माहिती समोर आली.


जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हा हल्ला होणार होता. पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये तालिब हुसेनचा या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. तालिबने यापूर्वी राजौरीमध्ये दोन बॉम्बस्फोटाची चाचणी घेतली होती. त्याने फैजलशी संपर्क साधला होता. त्यानंतर हे दोघे तुकसान जिल्ह्यातील गावात लपून बसले होते. त्यांनी पुढील हालचाल करण्यापूर्वीच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना अटक केली.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने