Categories: क्रीडा

पंतने मोडला धोनीचा विक्रम

Share

बर्मिंगहॅम (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात रिषभ पंतने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने अडचणीच्या वेळी १११ चेंडूंत १४६ धावांची गरजेची खेळी खेळली. त्याने ८९ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. या खेळीसह त्याने भारताचा माजी कर्णधार यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला आहे. ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद कसोटी शतक झळकावणारा भारतीय यष्टीरक्षक बनला आहे.

बर्मिंगहॅम कसोटी सामन्यातील पहिल्या डावात रिषभ पंतने १९ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने १४६ धावा कुटल्या. या सामन्यात त्याने ८९ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या कारकिर्दीतील पाचवे कसोटी शतक होते. या शतकासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. रिषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद कसोटी शतक झळकावणारा भारतीय यष्टीरक्षक बनलाय. यापूर्वी हा विक्रम एम.एस धोनीच्या नावावर होता. धोनीने २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ९३ चेंडूंत शतक झळकावले होते.

एजबॅस्टनच्या १२० वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच एका फलंदाजाने १०० पेक्षा कमी चेंडूंत शतक झळकावले आहे. या मैदानावर रिषभ पंत सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर या मैदानावर शतक ठोकणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरलाय. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीने या मैदानावर शतक झळकावले आहे.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

48 minutes ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago