पालघर (वार्ताहर) : पावसाळ्यात अंगावर वीज कोसळून जीवित, वित्तहानीच्या घटना अनेक ठिकाणी घडत असताना, हे नुकसान टाळण्यासाठी पालघर जिल्ह्यात ३३ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा बसवण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रशासकीय सरकारी इमारत, पोलीस ठाणे, रुग्णालय, विश्रामगृह अशा महत्त्वाच्या इमारतींवर ही यंत्रे बसविण्यात आली आहेत.
पालघर तालुक्यात सहा, डहाणू तालुक्यात नऊ, तर वसई तालुक्यात नऊ ठिकाणी ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड आणि वाडा या तालुक्यांमध्येही काही ठिकाणी ही यंत्रे बसविण्याचे प्रस्तावित आहे. या यंत्रांमुळे विजेमुळे होणारी जीवित व वित्तहानी कमी होण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले. या यंत्राच्या ३०० ते ५०० मीटरच्या परिघामध्ये वीज पडल्यास तिला अटकाव करता येणार आहे. गेल्या दोन वर्षांत पावसाळ्यात वीज पडून पालघर जिल्ह्यात ३९ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्कालीन कार्यालय व जिल्हा प्रशासकीय यंत्रणेकडून ही माहिती देण्यात आली.
जिल्ह्यात सध्या विविध सरकारी इमारती, रुग्णालय इमारती, महसूल कार्यालय, विश्रामगृहे, सार्वजनिक बांधकाम विभागांच्या कार्यालयांवर ही वीज अटकाव यंत्रे बसवण्यात आली आहेत. वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या भागांत ज्या ठिकाणी वीज पडून मृत्यू झाले आहेत किंवा ज्या भागात वीज पडते त्या भागांमध्ये अशा स्वरूपाची यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्याचे पालघरचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी सांगितले.
या ठिकाणी वीज अटकाव यंत्रे
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…