चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्या जेरबंद

नाशिक (हिं.स.) : नाशिक शहरातील सातपूरच्या अशोकनगर परिसरात आज सकाळी बिबट्या एका घराच्या अडगळीच्या ठिकाणी ठाण मांडून बसलेला दिसून आला. याठिकाणी अनेकांनी बिबट्या बघण्यासाठी गर्दी केली. याबाबत वनविभागाला माहिती मिळताच वनविभाग व पोलीस प्रशासन तात्काळ हजर झाले.


ऐन लोकवस्तीत बिबट्याचे दर्शन झाल्याने सगळीकडे पळापळ सुरु झाली होती. वनविभाग आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बिबट्याचे प्रथमतः लोकेशन तपासण्यात आले. अगदी शिताफीने हा बिबट्या सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नाअंती जेरबंद करण्यात आला. चार तासांच्या नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते. परिसरातील नागरिक दरवाजे खिडक्या बंद करून घरात बसलेले होते तर काही लोक बघ्यांच्या गर्दीत सामील झालेले होते.


नाशिक शहरातील सातपूर कॉलनी अशोकनगर परिसर कामगारांचा आहे. याठिकाणी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत करणारे कर्मचारी या भागात राहतात. आज कामगारांचा सुट्टीचा दिवस दिवस होता. मात्र, सकाळीच बिबट्या दिसल्याच्या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली होती. बिबट्या पकडण्यासाठी आलेल्या वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सापळा लावत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले. जवळपास चार तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला पकडण्यात यश आले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Comments
Add Comment

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी