उदयपूर हत्याकांडातील आरोपींना नागरिकांची मारहाण

  80

जयपूर (हिं.स.) : राजस्थानच्या उदयपूर हत्याकांडातील आरोपी मोहम्मद रियाझ अख्तारी, गौस मोहम्मद त्यांचे साथीदार आसिफ आणि मोहसीन या ४ आरोपींना एनआयए कोर्टाने १० दिवसांची कोठडी सुनावली आहे. उदयपूर घटनेच्या निषेधार्थ वकिलांमध्ये प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला. न्यायालयाच्या आवारात वकिलांनी घोषणाबाजी करण्याबरोबरच आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. यावेळी संतप्त नागरिकांनी आरोपीला मारहाण केली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


कन्हैयालालच्या निर्घृण हत्येप्रकरणी एनआयए आणि दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने आज, शनिवारी या आरोपींना कडक बंदोबस्तात जयपूरच्या एनआयए न्यायालयात हजर केले होते. न्यायालयात हजर करण्यापूर्वी पोलिसांचे पथक आरोपींना घेऊन एटीएसच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या (एसओजी) कार्यालयात पोहोचले. एनआयएने एटीएसकडून सर्व कागदोपत्री पुरावे गोळा केले. यानंतर कन्हैयालाल हत्याकांडातील दोन मुख्य आरोपी मोहम्मद रियाज अख्तारी व गौस मोहम्मद, त्यांचे सहकारी आसिफ आणि मोहसीन या चार आरोपींना एनआयए आणि एटीएसच्या पथकाने न्यायालयात हजर केले. सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालय आणि शहर परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


गेल्या २८ जून रोजी कन्हैयालालच्या हत्येनंतर राज्य सरकारने विशेष संशोधन पथक (एसआयटी) स्थापन करून तपास सुरू केला होता. परंतु, यानंतर प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला होता. हत्येतील प्रमुख आरोपी रियाझ अख्तारी आणि गौस मोहम्मद यांनी नूपुर शर्मा यांना पाठिंबा दिल्याबद्दल कन्हैयालाल यांची गळा चिरून हत्या केली होती. हत्येनंतर आरोपींनी इस्लामच्या अपमानाचा बदला घेतला, असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

Comments
Add Comment

Indian Railways Veg Meal Price : स्टेशनवर ७० तर ट्रेनमध्ये ८० रुपयांत मिळणार शाकाहारी जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

मुंबई : भारतात रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कोटींमध्ये आहे. दररोज कोट्यवधी लोक

शुभांशू शुक्लाने राकेश शर्माचा विक्रम मोडला, अंतराळात घालवले सर्वाधिक दिवस

नवी दिल्ली: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) एक आठवडा पूर्ण केला

हिमाचल प्रदेश : नैसर्गिक आपत्तीमुळे ६३ जणांचा मृत्यू, ४० बेपत्ता

राज्यात भूस्खलन, ढगफुटी आणि पुरामुळे भीषण परिस्थिती शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु

'ऑपरेशन सिंदूर'च्या निमित्ताने भारत तीन देशांशी लढला

नवी दिल्ली : 'ऑपरेशन सिंदूर'च्या निमित्ताने भारत तीन देशांशी लढला. पाकिस्तानचे सैन्य तसेच चीन आणि तुर्कीयेच्या

IPS सिद्धार्थ कौशल यांचा राजीनामा

नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवेत (IPS / Indian Police Services) १३ वर्ष सेवा केल्यानंतर आंध्र प्रदेशमधील आयपीएस अधिकारी सिद्धार्थ

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई: भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड