उदयपूर हत्याकांडातील आरोपींना नागरिकांची मारहाण

जयपूर (हिं.स.) : राजस्थानच्या उदयपूर हत्याकांडातील आरोपी मोहम्मद रियाझ अख्तारी, गौस मोहम्मद त्यांचे साथीदार आसिफ आणि मोहसीन या ४ आरोपींना एनआयए कोर्टाने १० दिवसांची कोठडी सुनावली आहे. उदयपूर घटनेच्या निषेधार्थ वकिलांमध्ये प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला. न्यायालयाच्या आवारात वकिलांनी घोषणाबाजी करण्याबरोबरच आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. यावेळी संतप्त नागरिकांनी आरोपीला मारहाण केली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


कन्हैयालालच्या निर्घृण हत्येप्रकरणी एनआयए आणि दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने आज, शनिवारी या आरोपींना कडक बंदोबस्तात जयपूरच्या एनआयए न्यायालयात हजर केले होते. न्यायालयात हजर करण्यापूर्वी पोलिसांचे पथक आरोपींना घेऊन एटीएसच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या (एसओजी) कार्यालयात पोहोचले. एनआयएने एटीएसकडून सर्व कागदोपत्री पुरावे गोळा केले. यानंतर कन्हैयालाल हत्याकांडातील दोन मुख्य आरोपी मोहम्मद रियाज अख्तारी व गौस मोहम्मद, त्यांचे सहकारी आसिफ आणि मोहसीन या चार आरोपींना एनआयए आणि एटीएसच्या पथकाने न्यायालयात हजर केले. सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालय आणि शहर परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


गेल्या २८ जून रोजी कन्हैयालालच्या हत्येनंतर राज्य सरकारने विशेष संशोधन पथक (एसआयटी) स्थापन करून तपास सुरू केला होता. परंतु, यानंतर प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला होता. हत्येतील प्रमुख आरोपी रियाझ अख्तारी आणि गौस मोहम्मद यांनी नूपुर शर्मा यांना पाठिंबा दिल्याबद्दल कन्हैयालाल यांची गळा चिरून हत्या केली होती. हत्येनंतर आरोपींनी इस्लामच्या अपमानाचा बदला घेतला, असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

Comments
Add Comment

Barabanki Road Accident : वेगमर्यादेचा बळी! बाराबंकीत ट्रक-अर्टिगाच्या धडकेत ६ ठार, ८ गंभीर जखमी; कारचा अक्षरशः चक्काचूर!

बाराबंकी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी (Barabanki) जिल्ह्यात सोमवारी रात्री भीषण रस्ते अपघात झाल्याची घटना समोर

Bengaluru News : क्रूरतेचा कळस! मोलकरणीनं लिफ्टमध्ये कुत्र्याच्या पिल्लाला आपटून संपवलं; मोलकरणीचं खोटं नाटक CCTV फूटेजमुळे उघड

बंगळुरु : कर्नाटकची राजधानी बंगळुरु (Bengaluru) येथील बागलूर (Bagaluru) मधील एका अपार्टमेंटमध्ये मुक्या जनावरासोबत अतिशय

Naxalite Surrender : 'सुनीता'चा माओवादी संघटनेला रामराम! १४ लाखांचे इनाम असलेली महिला नक्षलवादी अखेर शरण

बालाघाट : नक्षलग्रस्त भागातून एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बालाघाट

राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला, तर कंत्राटदाराला दंड; केंद्र सरकारचा निर्णय

निर्धारित कालावधीत एकापेक्षा जास्त अपघात झाल्यास होणार कारवाई नवी दिल्ली  : रस्ते अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी,

'पप्पू, टप्पू आणि अप्पू' - महाआघाडी म्हणजे गांधीजींची तीन माकडं!

योगी आदित्यनाथ यांचा बिहारमधून राहुल, तेजस्वी, अखिलेशवर हल्लाबोल दरभंगा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या

राहुल गांधींनी केला छठी मैय्याचा अपमान; बिहारमध्ये प्रचंड बहुमताने एनडीए सरकार स्थापन होईल - अमित शाह

पाटणा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी शेओहर आणि सीतामढी जिल्ह्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)