मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले असून भाजपच्या गोटात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजप नेत्यांनी बुधवारी रात्री बंदद्वार बैठक होऊन त्यात देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यासंदर्भात गुरुवारी पुन्हा फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक होणार असून त्यात नेता निवडीची औपचारिक घोषणा केली जाणार आहे.
यासंदर्भात भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप नेत्यांची पुन्हा एकदा बैठक होऊन त्यात नेता निवडीवर शिक्कामोर्तब होईल. तसेच एकनाथ शिंदे गटाशी भाजप सत्ता स्थापनेसंदर्भात वाटाघाटी करणार आहे. सत्ता स्थापनेचा दावा करायचा की, राज्यपालांच्या आमंत्रणाची प्रतिक्षा करायची याचा निर्णय देखील बैठकीत होणार आहे.
दरम्यान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासोबतच विधान परिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंकजा मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यांसदर्भात अद्याप निर्णय झाला नसून त्याबाबत येत्या दोन दिवसात चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन - वन मंत्री गणेश नाईक मुंबई : कोकणातील फळबागा आणि…
गागोदे खुर्द अनुसूचित जातीसाठी, १४ ग्रामपंचायतीत आदिवासी सरपंच पेण (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…