फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले असून भाजपच्या गोटात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजप नेत्यांनी बुधवारी रात्री बंदद्वार बैठक होऊन त्यात देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यासंदर्भात गुरुवारी पुन्हा फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक होणार असून त्यात नेता निवडीची औपचारिक घोषणा केली जाणार आहे.


यासंदर्भात भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप नेत्यांची पुन्हा एकदा बैठक होऊन त्यात नेता निवडीवर शिक्कामोर्तब होईल. तसेच एकनाथ शिंदे गटाशी भाजप सत्ता स्थापनेसंदर्भात वाटाघाटी करणार आहे. सत्ता स्थापनेचा दावा करायचा की, राज्यपालांच्या आमंत्रणाची प्रतिक्षा करायची याचा निर्णय देखील बैठकीत होणार आहे.


दरम्यान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासोबतच विधान परिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंकजा मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यांसदर्भात अद्याप निर्णय झाला नसून त्याबाबत येत्या दोन दिवसात चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,