२७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ४ ऑगस्टला होणार मतदान

Share

मुंबई (हिं.स.) : पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ६२ तालुक्यांमधील २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ ऑगस्ट २०२२ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ५ ऑगस्ट २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

मदान यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले ६२ तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदार ५ जुलै २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे १२ ते १९ जुलै २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील.

शासकीय सुट्टीमुळे १६ आणि १७ जुलै २०२२ रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २० जुलै २०२२ रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २२ जुलै २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. मतदान ४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी ५ ऑगस्ट २०२२ रोजी होईल.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या

नाशिक : बागलाण- १३, निफाड- १, सिन्नर- २, येवला- ४, चांदवड- १, देवळा- १३ आणि नांदगाव- ६.

धुळे : धुळे- २, साक्री- ४९ आणि शिंदखेडा- १.

जळगाव : रावेर- १२, अमळनेर- १, एरंडोल- २, पारोळा- ३ आणि चाळीसगाव- ६.

अहमदनगर : अहमदनगर- ३, श्रीगोंदा- २, कर्जत- ३, शेवगाव- १, राहुरी- ३ आणि संगमनेर- ३.

पुणे : हवेली- ५, शिरुर- ६, बारामती- २, इंदापूर- ४ आणि पुरंदर- २.

सोलापूर : सोलापूर- २, बार्शी- २, अक्कलकोट- ३, मोहोळ- १, माढा- २, करमाळा- ८, पंढरपूर- २, माळशिरस- १ आणि मंगळवेढा- ४.

सातारा : कराड- ९ आणि फलटण- १.

सांगली : तासगाव- १.

औरंगाबाद : औरंगाबाद- १, पैठण- ७, गंगापूर- २, वैजापूर- २, खुलताबाद- १, सिल्लोड- ३, जालना- ६, परतूर- १, बदनापूर- १९ आणि मंठा- २.

बीड: बीड- ३, गेवराई- ५ आणि अंबेजोगाई- ५.

लातूर : रेणापूर- ४, देवणी- १ आणि शिरूर अनंतपाळ- ४.

उस्मानाबाद : तुळजापूर- २, कळंब- १, उमरगा- ५, लोहारा- २ आणि वाशी- १.

परभणी : सेलू- ३.

बुलढाणा : खामगाव- २ आणि मलकापूर- ३. एकूण- २७१.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

9 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

41 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

1 hour ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

10 hours ago