मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. शिंदेंनी थेट शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्याचे आदेश ठाकरे सरकारला दिले. या निर्णयाविरोधात महाविकास आघाडीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर तब्बल साडेतीन तास युक्तीवाद करण्यात आला. यावर न्या. सूर्यकांत आणि जेपी पारदीवाला यांच्या पीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. शिवसेनेतर्फे अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली. यांच्यातील युक्तीवादानंतर ९ वाजता सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचीका फेटाळली आहे. बहुमत चाचणी उद्याच घेण्यात येणार असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.