आसाममध्ये ७४ हजार ६५५ हेक्टर पीक पाण्याखाली

  95

गुवाहाटी (हिं.स.) : आसाममध्ये आलेल्या पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील ४० लाखाहून अधिक लोक या पुरामुळे बाधित झाले असून १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच राज्यातील ७४ हजार ६५५ हेक्टरवरील पीक क्षेत्र पाण्याखाली गेले आहे.


या भीषण पुराच्या पार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली. कालदिया नदीला आलेल्या पुरामुळे सध्याची परिस्थिती आणि नुकसानीची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बजली जिल्ह्याचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी भबानीपूर, बजली येथील चारलपारा नयापारा येथील पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. पूरग्रस्त भागात मदतकार्यात गुंतलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरामुळे आत्तापर्यंत १३४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.


दरम्यान, हळूहळू आसाममधील पुराची स्थिती सुधारत आहे. काही भागात अद्यापही पुराचे पाणी आहे. बहुतांश नद्यांची पाणीपातळी कमी होत आहे. मात्र, नागावमधील कोपिली, कछारमधील बराक आणि करीमगंजमधील करीमगंज आणि कुशियारा धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत.


विमानाच्या माध्यमातून सिलचर शहरातील पुराचा नकाशा तयार करण्यासाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण केले जात आहे. विविध भागातील नुकसानीचे मूल्यांकन करुन भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी ते कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यास मदत होऊ शकते. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मागच्या दोन दिवसांत दोन वेळा सिलचरला भेट देऊन शहरातील मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतल्याची माहिती कचारचे उपायुक्त कीर्ती जल्ली यांनी दिली.


आसाममध्ये पुराच्या पाण्यामुळे ७९ रस्ते आणि पाच पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. तर सहा बंधारे तुटले आहेत. आसाममध्ये आलेल्या पुरामुळे ७४ हजार ६५५ हेक्टरवरील पीक क्षेत्र अजूनही पाण्याखाली आहे. आतापर्यंत २ हजार ७७४ जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत. दरम्यान, बॉलीवूड अभिनेता आमिर खान याने या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री मदत निधीला २५ लाख रुपयांची देणगी दिली.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या