मुंबई : शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड केला आहे. यावर बंडखोर आमदारांवर संजय राऊत यांनी टीका केली होती. या टीकेनंतर आता मनसेनेही या वादात उडी घेतली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांना राजसाहेबांनीच संपादक केल्याची आठवण करून दिली. देशपांडेंनी ट्विटरवरून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
संदीप देशपांडे यांनी ट्विट करून म्हटले की, “दुसऱ्यांना रिक्षावाला, पान टपरीवाला, भाजी विकणारा, वॉचमन म्हणणाऱ्या लोकांनी हे विसरू नये, ते स्वतः लोकप्रभामध्ये कारकून होते. तिथून उचलून राजसाहेबांनी तुम्हाला सामनाचे संपादक बनवलं.”
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली होती. या बंडखोर आमदारांना शिवसेनेनेच सर्वकाही दिल्याचे ते म्हणाले होते. काही जण रिक्षा चालवत होते, काही पानटपरी चालवत होते, काही जण वॉचमन होते पण आज शिवसेनेमुळे त्यांना मंत्रिपदे मिळाल्याचेही ते म्हणाले होते.
सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…
मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…
महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…
वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…
मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…