राष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हांचा अर्ज दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी संसद भवनात अर्ज दाखल केला. सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, सपा प्रमुख अखिलेश यादव, द्रमुकचे ए राजा आणि एनसी नेते फारुख अब्दुल्ला यांच्यासह अनेक प्रमुख विरोधी पक्षनेते उपस्थित होते.


एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी गेल्या आठवड्यातच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


राष्ट्रपती निवडण्यासाठी १८ जुलै रोजी निवडणूक होणार असून मतमोजणी २१ जुलै रोजी होणार आहे. या निवडणुकीत खासदार आणि आमदारांचा समावेश असलेल्या इलेक्टोरल कॉलेजमधील 4,809 सदस्य विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा उत्तराधिकारी निवडतील. लोकसभा आणि राज्यसभेत, तसेच अनेक राज्यांच्या विधानसभांमध्ये भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ पाहता आगामी निवडणुकीत भाजप पक्ष आपल्या उमेदवाराचा विजय सहज सुनिश्चित करण्याच्या स्थितीत आहे.


दरम्यान, रविवारी विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा म्हणाले होते, पुढील महिन्यात होणारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही वैयक्तिक लढतीपेक्षा खूप महत्वाची आहे. सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तींचा प्रतिकार करण्याच्या दिशेनं एक पाऊल आहे. माझा मुलगा आणि भाजप खासदार जयंत सिन्हाचा मला पाठिंबा न मिळाल्यामुळं मी कोणत्याही धर्म संकटात नाहीय. माझा मुलगा त्याचा राजधर्म पाळेल आणि मी माझा राष्ट्रधर्म पाळेन.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च