एमएसएमईचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध - नारायण राणे

नवी दिल्ली (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, या उद्योगांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि आत्मनिर्भरतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे.


आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिनानिमित्त आपल्या संदेशात ते म्हणाले की, कोविड-१९ महामारी आणि त्यानंतरच्या युक्रेन युद्धामुळे उद्भवलेल्या प्रतिकूल परिस्थितीतून सावरताना, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राने आपल्या उद्योग व्यवहारांचे डिजिटायझेशन करण्याबरोबरच उत्पादन खर्चातही कपात केली आणि अत्यावश्यक उत्पादनांची देशात निर्मिती करून आयात कमी करण्याची नवीन परंपरा सुरु करत सरकारच्या विविध योजनांच्या सहाय्याने त्या उत्पादनांची निर्यातही सुरू केली. या उद्योगानी त्यांच्या ऑनलाइन सेवा जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यावर लक्ष केंद्रित केले, परिणामी त्यांना प्रतिकूलतेवर मात करता आली असे ते यावेळी म्हणाले.


राणे म्हणाले, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि जागतिक शाश्वत विकासाचा कणा आहे. स्थानिक समुदायांना उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग योगदान देत आहेत. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि अभिनवतेला प्रोत्साहन देण्यासाठी, संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दरवर्षी २७ जून रोजी “आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिन” साजरा केला जातो.


ते म्हणाले की, यावर्षी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिनाची संकल्पना “लवचिकता आणि पुनर्बांधणी: शाश्वत विकासासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग” अशी आहे. छोट्या ग्रामीण, कुटीर आणि पारंपारिक उद्योगांनाही भरभराटीची संधी देणारे व्यवसाय पूरक वातावरण उपलब्ध करून देण्याचे सरकारला स्मरण राहावे जागतिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिन साजरा केला जातो.


प्रत्येक नागरिकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या सर्व सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे राणे यांनी हार्दिक अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

Comments
Add Comment

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ

पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

चालक परवान्याचे वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य

नवी दिल्ली  : चालक परवान्याची मुदत ज्या दिवशी संपते, त्याच दिवसापासून संबंधित व्यक्तीचा चालक म्हणून असलेला दर्जा