एमएसएमईचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध - नारायण राणे

नवी दिल्ली (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, या उद्योगांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि आत्मनिर्भरतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे.


आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिनानिमित्त आपल्या संदेशात ते म्हणाले की, कोविड-१९ महामारी आणि त्यानंतरच्या युक्रेन युद्धामुळे उद्भवलेल्या प्रतिकूल परिस्थितीतून सावरताना, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राने आपल्या उद्योग व्यवहारांचे डिजिटायझेशन करण्याबरोबरच उत्पादन खर्चातही कपात केली आणि अत्यावश्यक उत्पादनांची देशात निर्मिती करून आयात कमी करण्याची नवीन परंपरा सुरु करत सरकारच्या विविध योजनांच्या सहाय्याने त्या उत्पादनांची निर्यातही सुरू केली. या उद्योगानी त्यांच्या ऑनलाइन सेवा जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यावर लक्ष केंद्रित केले, परिणामी त्यांना प्रतिकूलतेवर मात करता आली असे ते यावेळी म्हणाले.


राणे म्हणाले, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि जागतिक शाश्वत विकासाचा कणा आहे. स्थानिक समुदायांना उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग योगदान देत आहेत. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि अभिनवतेला प्रोत्साहन देण्यासाठी, संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दरवर्षी २७ जून रोजी “आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिन” साजरा केला जातो.


ते म्हणाले की, यावर्षी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिनाची संकल्पना “लवचिकता आणि पुनर्बांधणी: शाश्वत विकासासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग” अशी आहे. छोट्या ग्रामीण, कुटीर आणि पारंपारिक उद्योगांनाही भरभराटीची संधी देणारे व्यवसाय पूरक वातावरण उपलब्ध करून देण्याचे सरकारला स्मरण राहावे जागतिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिन साजरा केला जातो.


प्रत्येक नागरिकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या सर्व सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे राणे यांनी हार्दिक अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

Comments
Add Comment

बीसीसीआयचा एसीसीवर दबाव, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावरून कारवाईचा इशारा

नवी दिल्ली : आशिया कप २०२५ नंतर विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी देण्यात आली नाही. ही ट्रॉफी मिळाली नाही तर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा

दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचं देशवासियांना भावनिक पत्र

नवी दिल्ली : दिवाळीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या

१० कोटींच्या चिनी फटाक्यांची तस्करी : डीआरआयच्या ऑपरेशन फायर ट्रेलची मोठी कारवाई

नवी दिल्ली: भारताच्या सीमांवरून चिनी फटाक्यांची बेकायदेशीर आयात करण्याचा मोठा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने

नागा अतिरेक्यांवर ड्रोन स्ट्राईक ? भारतविरोधी पी. आंग माई ठार ?

नायपिदाव : भारत-म्यानमार सीमेवर बंडखोरांच्या हालचाली वाढू लागल्यामुळे तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर २०