माफिया सरकारचा अंत जवळ आला; किरीट सोमय्या

  143

मुंबई (वार्ताहर) : महाराष्ट्र सरकारच्या माफिया सरकारचा अंत जवळ आला असल्याचा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला. तसेच पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सुरुवात करू या, असे ते म्हणाले.


एकीकडे शिवसेनेमध्ये बंडाळी माजलेली असताना दुसरीकडे भाजपने मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता प्रभाग निहाय बैठक सुरू केल्या आहेत. रविवारी किरीट सोमय्या यांनी घाटकोपरच्या पारशीवाडीमध्ये बैठक घेतली. या वेळी घाटकोपर पश्चिममधील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत बोलताना किरीट सोमय्या यांनी शिवसेना, महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.


यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही मला तोतरा म्हणा, टमरेल म्हणा. तुम्ही मला काही म्हणा, पण हिशोब तर द्यावाच लागणार. १९ बंगल्यांच्या घोटाळ्याचा हिशोब घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले.


उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत सोमय्या म्हणाले की, मनसुख हिरेनची हत्या ठाकरे सरकारने केली. मलाही मारण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर चार वेळा हल्ला करण्यात आला. कार्यकर्त्यांनी मला वाचवलं. महाराष्ट्र सरकारच्या माफिया सरकारचा अंत जवळ आला आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सुरुवात करू या.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही