माफिया सरकारचा अंत जवळ आला; किरीट सोमय्या

मुंबई (वार्ताहर) : महाराष्ट्र सरकारच्या माफिया सरकारचा अंत जवळ आला असल्याचा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला. तसेच पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सुरुवात करू या, असे ते म्हणाले.


एकीकडे शिवसेनेमध्ये बंडाळी माजलेली असताना दुसरीकडे भाजपने मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता प्रभाग निहाय बैठक सुरू केल्या आहेत. रविवारी किरीट सोमय्या यांनी घाटकोपरच्या पारशीवाडीमध्ये बैठक घेतली. या वेळी घाटकोपर पश्चिममधील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत बोलताना किरीट सोमय्या यांनी शिवसेना, महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.


यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही मला तोतरा म्हणा, टमरेल म्हणा. तुम्ही मला काही म्हणा, पण हिशोब तर द्यावाच लागणार. १९ बंगल्यांच्या घोटाळ्याचा हिशोब घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले.


उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत सोमय्या म्हणाले की, मनसुख हिरेनची हत्या ठाकरे सरकारने केली. मलाही मारण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर चार वेळा हल्ला करण्यात आला. कार्यकर्त्यांनी मला वाचवलं. महाराष्ट्र सरकारच्या माफिया सरकारचा अंत जवळ आला आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सुरुवात करू या.

Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती